मुंबई : पावसाळ्यातील सर्वसामान्य स्थितीच्या तुलनेत निराळी  स्थिती निर्माण झाल्यामुळे गेले दोन दिवस मुंबईत वादळी पाऊस झाला. दिवसभरात  के वळ रिपरिप सुरू असली तरीही रात्रीपासून ते सकाळ होईपर्यंत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. रविवारी पहाटेपर्यंत मुंबईत  २०० मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडला,  हवामान विभागाने त्याबाबत पूर्वानुमान दिले नव्हते.सर्वसाधारण स्थितीत जून ते सप्टेंबरमध्ये १२ कमी दाबाचे पट्टे बंगालच्या उपसागरावर निर्माण होतात, पैकी ६ तीव्र प्रकारचे असतात. कमी दाबाचे पट्टे वाऱ्यांना स्वत:कडे खेचतात. त्यामुळे मुंबईवर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे सक्रिय होतात व मुसळधार पाऊ स पडतो.  संपूर्ण जून महिन्यात कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार झालेला नाही. परिणामी, मुंबईत के वळ सुमारे ३ किमी उंचीपर्यंतच वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहात आहेत. त्याच्या वरील भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहात आहेत, अशी अस्थिर स्थिती असल्याचे निरीक्षण इंग्लंडच्या रेडिंग विद्यापीठातील हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी नोंदवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहने पुलावर : मिठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले कपाडिया नगर, टॅक्सीमन वसाहत आदी भाग दर पावसाळ्यात पाण्याखाली जातात. शनिवारी झालेला मुसळधार पाऊसही त्यास अपवाद नव्हता. शनिवारी या वसाहतींमध्ये दोन ते तीन फू ट पाणी साचले. मात्र हे पाणी मिठी नदीऐवजी लालबहाद्दूर शात्री मार्गावरून वाहत आल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते. पाणी साचू लागल्याने यातील टॅक्सीमन वसाहतीतील नागरिकांनी आपली वाहने मिठी नदीवरील उड्डाणपुलावर आणून उभी के ली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains in mumbai due to climate change zws
First published on: 19-07-2021 at 03:35 IST