मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात थंडी वाढत होती. आता मुंबईसह राज्यातील किमान तापमानात हळूहळू वाढ होऊन वातावरणातील गारवा कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईतील किमान तापमान १५ ते २० अंश आणि राज्यातील बहुतांश भागातील तापमान १० अंशाहून अधिक राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

हेही वाचा >>> मुंबईः बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ३३ लाख रुपये उकळले

pune traffic changes dahihandi
पुणे: दहीहंडीनिमित्त मध्यभागातील वाहतुकीत बदल
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
heavy rain, heavy rain predicted for mumbai, Mumbai, Konkan, weather forecast, Thane, Palghar, heatwave, low pressure, Sindhudurg,
मुंबईत शनिवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज
pune city experience extreme heat marathi news
ऐन पावसाळ्यात पुण्यात उकाडा… काय आहे कारण?
Monsoon Alert Rains will be active again in central India
मान्सून अलर्ट : मध्य भारतात पुन्हा सक्रिय होणार
Special trains, Konkan, holidays,
सलग सुट्टीच्या दिनी कोकणात धावणार विशेष रेल्वेगाडी
dams, Nashik district, overflow,
चार धरणे तुडुंब, नऊमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साठा, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ५७ टक्क्यांवर
Due to reduced rainfall in Nashik discharge from eight dams was reduced
नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदावरीचा पूर ओसरला….; जायकवाडीला साडेदहा टीएमसी पाणी

मुंबईमधील यंदा थंडीच्या हंगामातील किमान तापमान रविवारी १३.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्यानंतर गेले दोन दिवस किमान तापमान १५ अंशादरम्यान आहे. तर, आता बुधवारपासून मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी सौम्य गारवा आणि दुपारच्या वेळी सौम्य उन्हाचे चटके बसणार आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या शीत वाऱ्यांचा प्रभाव आता कमी होणार असल्याने राज्यातील किमान आणि कमाल तापमानात हळूहळू वाढ होणार आहे. राज्यातील काही ठिकाणीच गारठा जाणवणार आहे. तर, १८ आणि २० जानेवारी रोजी पश्चिमी झंझावात येणार असल्याने पुन्हा वातावरणात बदल होणार आहे. २० जानेवारीला येणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळे वातावरणात बऱ्यापैकी बदल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिली.