चित्रपट माध्यमात दिग्दर्शिकांचा जमाना सुरू झाला नव्हता तेव्हाची गोष्ट. दिग्दर्शक म्हटला की ‘तो’च असणार, हे जणू प्रेक्षकांनीही गृहितच धरलेलं. अशा स्थितीत १९८०मध्ये दृष्टीहीनांचं जगणं मांडणारा ‘स्पर्श’ हा पहिला सुखद धक्का होता. त्याच्या पुढच्याच वर्षी झळकला ‘चष्मे बद्दूर’! या चित्रपटाच्या नामावलीत ‘दिग्दर्शक’ अशी झळकणारी पाटी बांगडय़ा ल्यायलेल्या हातांनी दूर सारल्याचे दृश्य रूपेरी पडद्यावर दिसलं आणि पाठोपाठ नाव झळकलं.. ‘दिग्दर्शिका सई परांजपे’! आणि सुरू झाला संवेदनशील पण खटय़ाळ चित्रपटांचा सिलसिला..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज दिग्दर्शिकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. निर्मातेच नव्हे, तर प्रेक्षकही त्यांच्यावर  विश्वास टाकून चित्रपटांना गर्दी करीत आहेत. पण जेव्हा ही वाट दिग्दर्शिकांसाठी तेवढी सुगम नव्हती तेव्हा त्या वाटेवर पाऊल रोवणाऱ्या सई परांजपे यांचे कर्तृत्व म्हणूनच अतिशय प्रेरक आहे. त्यांच्या या वाटचालीचे अनुभव, या वाटचालीत चित्रपट, नाटक आणि लेखन या क्षेत्रांना समृद्ध करण्यातले त्यांचे योगदान हे सारं त्यांच्याच शब्दांत जाणून घेण्याची संधी रसिकांना लाभणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta gappa with sai paranjpye
First published on: 19-08-2018 at 00:06 IST