मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली आहे. मंत्रालयात एक निनावी पत्र आले असून त्यात मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. मागच्या महिन्यात गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती तसेच आता पुण्यातून नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक निनावी पत्र आले आहे.

या पत्रात आमचा मार्क्सवादाचा विचार तुम्ही संपवू शकणार नाही असे म्हटले आहे. दरम्यान हे पत्र मिळाल्यानंतर गृहविभागाने मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा अधिक कडक केली आहे.