अभिनेते गिरीश साळवी यांचं निधन झालं आहे. अभिनेते आणि लेखक राजेश देशपांडे यांनी फेसबुक पोस्ट करुन या संदर्भातली माहिती दिली आहे. दीर्घ आजाराने गिरीश साळवी यांचं निधन झालं असल्याची माहिती राजेश देशपांडे यांनी पोस्ट केली आहे.

 

Raghu Ram blames the MTV show for his divorce
“रोडीजमुळे माझा घटस्फोट झाला,” प्रसिद्ध अभिनेत्याचं विधान; म्हणाला, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात…”
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी

बुद्धिबळ आणि झब्बू, ७४ पावसाळ्यांचा खर्च ही त्यांची नाटकं रंगभूमीवर गाजली होती. धुडगूस या सिनेमाची त्यांनी निर्मितीही केली होती. एक प्रयोगशील अभिनेता, एक चांगला दिग्दर्शक आणि निर्माता अशी ओळख असलेले गिरीश साळवी यांचं निधन झालं आहे.

गिरीश साळवी यांचं वरळी येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. चं.प्र देशपांडे यांच्या बुद्धिबळ झब्बू या नाटकात त्यांच्या अभिनयाची जादू पाहण्यास मिळाली होती. तसंच विजय तेंडुलकर लिखित चौऱ्याहत्तर पावसळ्यांचा जमाखर्च या दीर्घांकातलाही त्यांचा अभिनय सर्वांगसुंदर होता. सहज साधा वावर, स्पष्ट उच्चार, टायमिंग आणि नाटकांच्या लयीचे उत्तम भान हे त्यांच्या अभिनयाचे विशेष होते.

७२ पावसाळ्यांचा जमाखर्च हा दीर्घांक, बुद्धिबळ आणि झब्बू, इंदू काळे सरला भोळे, खेळीमेळी, दावेदार ही त्यांची नाटकं आणि त्यातला त्यांचा अभिनय आजही रसिकांच्या स्मरणात आहे.