‘एमपीएससी’चे परीक्षार्थी १८ वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अठरा वर्षांपूर्वी घेतलेल्या परीक्षेत निकाल राखून ठेवलेले उमेदवार अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. न्यायालयाने चौकशीचे आदेश देऊनही चौकशी नाही आणि नोकरीही नाही अशी या उमेदवारांची स्थिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९९९ मध्ये पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, मंत्रालय सहाय्यक या पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल तब्बल चार वर्षांनी म्हणजे २००२ मध्ये जाहीर झाला. मात्र त्यानंतरही उमेदवारांना दिलासा मिळाला नाही. निकालात काही गोंधळ   झाला. ३९८ उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले. या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. मात्र, उत्तरपत्रिका बदलल्याचे सांगून आयोगाने उमेदवारांना काळ्या यादीत टाकले. परंतु नियमानुसार परीक्षा रद्द केली नाही. या प्रकरणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. परंतु गेल्या अठरा वर्षात प्रकरणाची चौकशीही झाली नाही आणि नोकरीही नाही अशी स्थिती असल्याचे उमेदवारांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc exam no job no inquiries mpsc student akp
First published on: 17-06-2021 at 01:07 IST