मुंबई : देशभरात २०२२ मध्ये एक लाख ९३ हजार ३८५ आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली असून २०२१ च्या तुलनेत त्यात सुमारे ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गंभीर बाब म्हणजे ५० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर सर्वाधिक आर्थिक गुन्ह्यांची मुंबईत नोंद झाली आहे.

हेही वाचा >>> मुंबई : विवाहित प्रेयसीचे अश्लील छायाचित्र काढून १७ लाखांची खंडणी उकळली; आरोपी प्रियकराला अटक

economic survey report uncertainty in job sector due to ai
‘एआय’मुळे नोकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचा इशारा
Panvel, CIDCO, water cut, Hetwane dam, heavy rains, water storage, Kharghar, Ulve, Dronagiri, water supply, water shortage, tankers,
सिडको वसाहतींमधील २० टक्के पाणी कपात रद्द होणार
mp women burried
रस्त्याच्या बांधकामाला विरोध केल्याने दोन महिलांना मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली गाडलं; मध्यप्रदेशातील धक्कादायक घटना!
Hathras stampede Bhole Baba has divided major parties in Uttar pradesh
हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी ‘भोले बाबा’वर आरोप का नाही? काँग्रेस-बसपा आक्रमक; भाजपा-सपाचा सावध पवित्रा
2 killed in tree fall incidents in mumbai in two consecutive days
परेल येथे झाड पडून महिला ठार; दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यू
mumbai reports 3 thousand dog bite incidents in three years
श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ; मुंबईत तीन वर्षांत ३ हजार श्वान चाव्याच्या घटना
iran election iran to hold runoff election between reformist masoud pezeshkian and hard liner saeed jalili
इराणमध्ये अध्यक्षपदासाठी फेरमतदान; सुधारणावादी मसूद पेझेश्कियाँ आघाडीवर, पण बहुमताची हुलकावणी
Gujarat police
गुजरातमध्ये पोलीस ठाण्यात केक कापून भाजपा नेत्याचा वाढदिवस साजरा? काँग्रेसने शेअर केलेल्या VIDEO मध्ये नेमकं काय दिसतंय?

भारतामध्ये २०२० पासून दाखल करण्यात आलेल्या आर्थिक गुन्ह्यांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशात २०२० मध्ये एक लाख ४५ हजार ७५४ आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली होती. पुढील वर्षी, म्हणजे २०२१ मध्ये एक लाख ७४ हजार १३ गुन्हे नोंदवण्यात आले. तर, २०२२ मध्ये एक लाख ९३ हजार ३८५ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यात फसवणूक, फौजदारी विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी देशभरात एकूण चार लाख ११ हजार ७५२ आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता.

देशातील महानगरांचा विचार केल्यास आर्थिक गुन्ह्यांबाबत मुंबई आघाडीवर आहे. एकटय़ा मुंबईत २०२२ मध्ये सहा हजार ९६० आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर असून तिथे सहा हजार १५ आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली होती. ५० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीचा विचार केल्यास मुंबई दुसऱ्या तर दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी या प्रकारचे मुंबईत १० तर दिल्लीत १२ गुन्ह्यांची नोंद झाली होती. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये राज्यांत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. राज्यात ५० कोटी अथवा त्यापेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे सर्वाधिक म्हणजे २० गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी पाच गुन्ह्यांमध्ये फसवणुकीची रक्कम १०० कोटींपेक्षा अधिक असल्याचे नोंदवण्यात आले आहे.