शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा भाजपाला दिला आहे. तसेच उद्या शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळे राऊतांनी उल्लेख केलेले ते भाजपाचे साडेतीन लोक कोण असतील याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून आता नाना पटोले यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे.

“संजय राऊत तुमच्यात हिंमत असेल तर…”; किरीट सोमय्यांचं राऊतांना आव्हान

rohit pawar
हुंदका आवरला, आवंढा गिळला; शेवटच्या प्रचारसभेत रोहित पवार भावूक, शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
sharad pawar on religion basis reservation
“धर्माच्या आधारावर आरक्षण आम्हाला मान्य नाही”; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मोदींनी स्वत:..”
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…

माध्यमांशी बोलताना ना पटोले म्हणाले की, “संजय राऊत जी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि ज्या साडेतीन लोकांबद्दल बोलणार आहेत, ते मला माहीत आहे. परंतु त्यांचा पेपर मी आज का फोडू?. राऊतांनी इशारा दिल्यानं आज त्या साडेतीन शहाण्यांना झोप लागणार नाहीये, ते लोक कोण आहेत हे मला माहिती आहे? पण उद्यापर्यंत जरा सस्पेन्स राहु देत. या साडेतीन शहाण्यांपैकी काही दिडशहाणे आहेत, त्यामुळे ते साडेतीन शहाणे आहेत,” असं नाना पटोले म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते संजय राऊत

“काही लोक हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल, अनिल देशमुखांच्या कोठडीच्या बाजूला जाईल असं बोलत आहेत. मात्र, मला असं वाटतं की पुढील काही दिवसात भारतीय जनता पार्टीचे साडेतीन लोक हे अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील. या साडेतीन लोकांना कोठडीत ठेवण्याची तयारी सुरू आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि… : संजय राऊत

संजय राऊत पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे हे लक्षात घ्या. हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वात आहे हेही लक्षात घ्या आणि सरकार हे सरकार असतं. पाहू कोणात किती दम आहे. खूप सहन केलं आता उद्ध्वस्त करणार आहे. राजकारणात एक मर्यादा असते, ती मर्यादा ओलांडली गेली आहे.”

“मी कोणाविषयी बोलतोय हे सर्वांना माहिती आहे. त्यांची झोप उडाली आहे. तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारच्या धमक्या आम्हाला देऊ नका, आम्ही घाबरणारे नाहीत. मी तर कधीच घाबरणार नाही. जे करायचं ते करा,” असंही राऊतांनी नमूद केलं.