दोन वर्षांत केवळ अडीच टक्के काम पूर्ण; एमएसआरडीसीकडून कंत्राटदाराला नोटीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबईतील महत्त्वाकांक्षी अशा वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. मागील दोन वर्षांत केवळ अडीच टक्केच काम पूर्ण झाले आहे. हा वेग पाहता प्रकल्प पूर्णतेस विलंब होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कंत्राटदारावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या नोटिशीद्वारे कंत्राटदाराला कामाला गती देण्याचे आदेश देण्यात आले असून त्यात कारवाईचेही संकेत देण्यात आले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only 2 5 percent civil work completed on versova bandra sealink in last 2 years zws
First published on: 02-09-2021 at 02:29 IST