“उद्धव ठाकरे या महाराष्ट्रात आता चालणार नाही तुमचे नखरे, कारण आता आमच्याबरोबर आहेत राज ठाकरे”, असं म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर आज महायुतीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या कवितेतून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली.

हेही वाचा – राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसमोरच केला पंडित नेहरूंचा उल्लेख; नेमकं काय घडलं?…

sharad pawar group
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यावरून शरद पवार गटाचं भाजपावर टीकास्र; म्हणाले,“राम मंदिर अन् संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या…”
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
MNS cancel dahi handi in Dombivli and Badlapur
मनसेची डोंबिवली, बदलापूरमधील दहीहंडी रद्द, आमदार प्रमोद पाटील यांची माहिती
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande : “संजय राऊतांचा बुद्ध्यांक कमी झालाय, त्यामुळे त्यांना…”; राज ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेला मनसेचं प्रत्युत्तर!
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Ramgiri Maharaj, Prophet Muhammad,
Ramgiri Maharaj : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
cm eknath shinde reaction uddhav thackeray convoy attack
Eknath Shinde : “अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन…”; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया!
sanjay raut reaction on raj thackeray attacked
Sanjay Raut : “ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, पण…”; राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्याच्या घटनेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

काय म्हणाले रामदास आठवले?

“महाराष्ट्रात आणि देशात लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करतो आहे. या देशात बाबासाहेबांचे संविधान मजबूत आहे. या देशाचे पंतप्रधान मजबूत आहेत. या राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार, राज ठाकरे आणि मी मजबूत आहे. त्यामुळे तुम्हाला जे बोलायचं असेल, ते बोला चार तारखेला आम्हीच तुम्हाला देणार आहोत जबरदस्त टोला”, अशी खोचक टीका रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर केली.

“या ठिकाणी आम्ही सर्व इथे आलो आहोत. मोदींचे नेतृत्व विकासाच्या दिशेने जात आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईच्या विकासासाठी केंद्र सरकारने हजारो कोटी रुपये दिले आहेत. अजूनही पैसे मिळणार आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कोणाचाही डाव नाही. मुंबई ही राज्याची राजधानी आहे. या मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्याला झोडल्याशिवाय राहणार नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – महायुतीच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींकडे पाच मागण्या; म्हणाले “सर्…

“निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आणि बाबासाहेबांचे संविधान धोक्यात आहे, असा आरोप केला जातो. मात्र, बाबासाहेबांचे संविधान धोक्यात नाही. याउलट महाविकास आघाडी धोक्यात आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणीही बदलू शकत नाही, अशी अफवा पसरवून दलित समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, यावेळी त्यांनी कवितेतून उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. “उद्धवजी या महाराष्ट्रात आता चालणार नाही तुमचे नखरे, कारण आता आमच्याबरोबर आहेत राज ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग तुम्ही त्यांच्याकडे का गेला उद्धव ठाकरे”, असे ते म्हणाले.