आजपर्यंत या देशात कोणीही घेऊ शकलं नाही, असे धाडसी निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतले, त्याबाद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवं, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केलं आहे. तसेच महायुतीच्या व्यासपीठावरून त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर पाच मागण्यादेखील मांडल्या आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कवर आज महायुतीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा – Sanjay Raut on Raj Thackeray: राज ठाकरे, मोदींची एकत्र सभा; संजय राऊतांनी केला हल्लाबोल

Thackeray group, resign, Thane,
ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
crime news ias office wife eloped with gangster
गँगस्टरबरोबर पळून गेलेल्या IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या, मुख्यमंत्र्यांसाठी लिहिले पत्र! चक्रावून टाकणारं नेमकं प्रकरण वाचा
Pune, BJP worker, threatened, revolver, contract dispute, sewerage department, Pune Municipal Corporation, junior engineer, Khadak police,
पुणे : महापालिकेत दहा कोटींचा ठेका मिळवण्यावरून वाद; भाजप कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखले
cases against Jitendra Awhad for remarks on ram to be investigated by shirdi police says bombay hc
श्रीरामाबाबत वादग्रस्त विधान : न्यायालयाने फटकारल्यानंतर आव्हाडांविरोधातील सर्व गुन्हे शिर्डी पोलिसांकडे वर्ग
Dombivli, Woman Throws Kitten to Death, Woman Throws Kitten from Fifth Floor, Police Investigate Incident, Dombivli news,
डोंबिवलीत मांजराच्या पिल्लाला महिलेने पाचव्या माळ्यावरून फेकले
Settlement outside Bholebaba Ashram Inspection of the incident site by Chief Minister
‘भोलेबाबा’च्या आश्रमाबाहेर बंदोबस्त; मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी
Mast Group, trast Group,
संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर टीका, पुण्यात मस्त ग्रुप – त्रस्त ग्रुपच्या बॅनरची चर्चा
manager arrested for beating police constable in andheri bar mumbai
पोलीस शिपायाला धक्काबुक्की करून मारहाण; बार व्यवस्थापकाला अटक

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

“पंतप्रधान मोदी यांच्या २०१४-२०१९ च्या कार्यकाळाबद्दल मला जे बोलायचं होतं ते मी २०१९ ला बोललो. आता २०१९ ते आत्तापर्यंतचं बोलतो. माझ्यापूर्वी भाषण केलेल्या प्रत्येकाने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. मात्र, माझ्यामते त्यांच्यावर टीका करून वेळ वाया घालवण्यात काहीही अर्थ नाही. कारण ते सत्तेत येणार नाहीत, मुळात अशा लोकांबाबत बोलण्यात काय फायदा?” अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

“धाडसी निर्णायांबद्दल मोदींचं अभिनंतर करायला हवं”

“पंतप्रधान मोदी होते म्हणूनच आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलं आहे, काश्मीरला विशेष दर्जा देणारा ३७० कलम रद्द झालं आहे. काश्मीर भारताचा भाग आहे हे ३७० कलम रद्द झाल्यानंतर भारतीयांना पहिल्यांदा वाटू लागले आहे. शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोटगीच्या बाजूने न्याय दिला होता, पण राजीव गांधींनी कायदा संमत करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. पण मोदींनी याच पीडित मुस्लीम महिलांना तिहेरी तलाकमधून बाहेर काढलं, त्यांच्यावर जो अन्याय होत होता, तो अन्याय कायमचा दूर केला. हे सर्व निर्णय धाडसी होते, त्यामुळे पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करायला हवं”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “४ जूननंतर सुपारीचं दुकान बंद होणार”, राज ठाकरेंचं नाव घेत संजय राऊतांची टीका

राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींकडे पाच मागण्या

पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींकडे पाच मागण्याही मांडल्या. “पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे मी त्यांच्यापुढे काही मागण्या मांडतो आहे. पहिलं म्हणजे सर्वात आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही जुनी मागणी आहे, ती मागणी त्यांनी पूर्ण करावी. मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्चा द्यावा. दुसरं म्हणजे जवळपास १२५ वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं त्याचा इतिहासाचा देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा. तिसरं म्हणजे शिवछत्रपतींची स्मारकं म्हणजे त्यांनी उभारलेले गडकिल्ले. या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती नेमून लक्ष द्यावं. चौथ म्हणजे देशात तुम्ही जसे उत्तम रस्ते बनवलेत, पण गेली २० वर्ष रखडलेला आमचा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून द्यावा. आणि शेवटचं म्हणजे मुंबई रेल्वेच्या विकासाकडे लक्ष द्यावं, रेल्वेच्या फेऱ्या वाढवा, प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून मुंबई रेल्वेला भरपूर निधी द्या”, असे राज ठाकरे म्हणाले.