कामोठे थांब्यावरील रिक्षाचालकांना शुक्रवारी सायंकाळी १०-१५ तरुणांनी मारहाण केली. याविषयी रिक्षाचालक अशोक दगडे, कैलास जवळे, दिलीप घनवट, सुखदेव चौधरी व शंकर जाधव यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
तीन आसनी रिक्षाचालकांच्या प्रतिनिधींनी वाहतूक व स्थानिक पोलिसांकडे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक वाहनांची लेखी तक्रार केली होती, त्यानंतर ही घटना घडली.  कळंबोली हायवे ते खारघर रेल्वेस्थानक या पल्ल्यावर तीन आसनी रिक्षा शेअर पद्धतीने प्रवासी वाहतूक करतात. त्याच पल्ल्यावर मॅजिक वाहने अवैधरीत्या चालत असल्याचे तीन आसनी रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. याच वादातून ही मारहाण झाली असावी, असा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw driver beaten in kalamboli
First published on: 04-04-2015 at 04:20 IST