मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नागपूर – शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले होते.  वर्षभरात या मार्गावरून ५८ लाख १ हजार १५४ वाहनांनी प्रवास केला आहे. तर, या वाहनांकडून ४२२ कोटी ९ लाख ७९ हजार ३९९ रुपये पथकर वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांचे होणार ‘अभिमत आरोग्य विद्यापीठ’!

Uran Panvel road work
जासई शंकर मंदिर उभारणीसाठी ठोस निर्णय हवा, जेएनपीए प्रशासनाकडे जासई ग्रामस्थांची मागणी
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Traffic movement after debris clear on vani ghat
वणी घाटातील दरड हटवून मार्ग मोकळा
Traffic jam due to road works in Mankhurd T Junction area
दोन मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तास, मानखुर्द टी जंक्शन परिसरातील रस्ते कामांचा फटका
Question mark on stealth traffic after accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील अपघातानंतर चोरट्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह
Fast and traffic free travel from Vadape to Thane from May 2025 onwards
वडपे ते ठाणे जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवास मे २०२५ पासून
Heavy vehicles banned in Ghodbunder area due to metro work
मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर भागात अवजड वाहनांना बंदी
Heavy traffic jam on Mumbai-Ahmedabad National Highway
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

राज्याची राजधानी आणि उपराजधानी यामधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ७०१ किमीचा समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा महामार्ग आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी कामास विलंब झाला असून एमएसआरडीसीने टप्प्याटप्प्यात हा मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. तर, मे २०२३ मध्ये शिर्डी – भरवीर अशा ८० किमीच्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते.

७३ अपघातात १४२ जणांचा बळी.. 

समृद्धी महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्यापासून  हा मार्ग अपघातांमुळे वादात सापडला आहे. वर्षभरात या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आतापर्यंत (डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३) या महामार्गावर ७३ अपघात झाले.  यात १४२ प्रवाशांचा बळी गेला. सर्वाधिक २० अपघात हे वाहनांवरील नियंत्रणामुळे झाले.