मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने गेल्यावर्षी नगरविकास विभागाच्या सहकार्याने हाती घेतलेला ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ हा उपक्रम नव्या राज्य सरकारच्या काळात बारगळला आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने गुंडाळून ठेवला आहे. आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून याबद्दल नाराजी व्यक्त केली. १८६ शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगरपालिका शाळांच्या आवारात तसेच सभोवतालच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विविध प्रकल्प राबवण्याचा संकल्प महानगरपालिका प्रशासनाने आधीच्या सरकारच्या काळात घेतला होता. सुरक्षित शाळा या विषयाचे सुतोवाच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातही केले होते. त्याकरिता ५० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. या प्रकल्पाची सुरुवात मे २०२२ मध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते. मात्र नंतर जूनमध्ये राज्यात सत्तांतर झाले. नवीन सरकारच्या काळात आता हा प्रकल्प बारगळला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Safe schools initiative for students aditya thackeray displeasure ysh
First published on: 15-11-2022 at 01:13 IST