ग्राहकाकडून विम्याचा दावा करण्यास उशीर झाला या कारणास्तव वा ही सबब पुढे करत विमा कंपन्या त्यांचा दावा फेटाळून लावू शकत नाही. कंपन्यांचा हा खाक्या असाच सुरू राहिला तर ग्राहकांचा विमा कंपन्यांवरील विश्वास पूर्णपणे उडेल, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयाला या दु:खातून सावरायला थोडा वेळ लागतो. ते साहजिक आहे. अशा दु:खाच्या क्षणी कुठलेही कुटुंब कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याच्या मन:स्थितीतही नसते वा त्यांना त्या क्षणी त्या पूर्ण करणे महत्त्वाचेही वाटत नाही; परंतु हीच बाब बऱ्याचदा कायदेशीर गुंतागुंत निर्माण करणारी ठरते. विशेष करून विमा योजनांच्या बाबतीत तर ही बाब खूपच त्रासदायक ठरते. विमा कंपन्या याच परिस्थितीचा फायदा उठवून विम्याची रक्कम नाकारतात आणि त्याचा फटका आतापर्यंत अनेक कुटुंबांना वा कित्येक विमाधारकांना बसलेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवडय़ात दिलेल्या निकालामुळे विमा कंपन्यांना दणका दिला असून ‘ग्राहक हाच राजा’ असल्याची त्यांना आठवण करून दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc order reliance insurance to pay compensation to truck owner
First published on: 11-10-2017 at 03:59 IST