नागपूर : भारतात शहरी आणि ग्रामीण भागातील हवेच्या गुणवत्तेत ३० ते ५० टक्के प्रमाण हे घरातून होणाऱ्या प्रदूषणाचे आहे. गॅस सिलेंडर जोडणी सुरू करणे आणि त्यात पुनर्भरण करणे दिवसेंदिवस खर्चिक होत चालले आहे. त्यामुळे आजही ७८ टक्के ग्रामीण महाराष्ट्रात घरांमध्ये चुलीचा वापर होत असून  इंधन म्हणून लाकूडफाटय़ाचा वापर केला जात असल्याने प्रदूषणामुळे महिलांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरीब घरांमध्ये प्रदूषणविरहित इंधन न वापरण्यामागे प्रमुख कारण वाढत असलेल्या किमती आहे. राज्यातील ३६ टक्के घरांमध्ये गॅससिलेंडर असूनही इतर इंधनाचा वापर केला जातो. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड आणि छत्तीसगड या सहा राज्यांमधील ८६ टक्के घरांमध्ये एलपीजी जोडणी आहे. तरीही शहरातील झोपडपट्टय़ांमधील एकतृतीयांश घरांमध्ये अजूनही लाकडी सरपण, गोवऱ्या, कृषी अवशेष, केरोसीन यासारख्या प्रदूषण निर्माण करणाऱ्या इंधनाचा वापर केला जातो. ‘वॉरिअर मॉम्स’ने आता याबाबत जनजागृतीसाठी मोहीम सुरू केली आहे. 

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air pollution homes households stoves smoke affects health ysh
First published on: 01-07-2022 at 00:02 IST