लोकसत्ता टीम

यवतमाळ : पंजाबचे व्यापारी नागपूर येथे जात असताना त्यांची भरधाव इनोव्हा कार वर्धा नदीच्या पुलावरून थेट खाली कोसळली. कळंबपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या यवतमाळ-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीजवळ झालेल्या या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली.

leopard attacks in shirur woman dies in leopard attacks in Jambut
शिरुरमध्ये बिबट्यांचे हल्ले; जांबूतमध्ये महिलेचा मृत्यू, कान्हूर मेसाई गावात एकजण जखमी
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Raj Thackeray, Jay Malokar, Raj Thackeray Consoles Jay Malokar family, raj Thackeray akola visit, MNS, Jay Malokar, Akola visit, Raj Thackeray Vidarbha tour
अकोला : जय मालोकारच्या कुटुंबाचे राज ठाकरेंकडून सांत्वन, घातपात झाल्याचा…
old woman injured, leopard attack Ratnagiri Pali,
रत्नागिरी पाली येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी
Nagpur has lost its status as green city due to the reduction of green cover due to cement roads
नागपूरमध्ये सिमेंट रस्त्यांमुळे हरित आच्छादनात घट, ग्रीन सिटीचा दर्जा हिरावला
Haji Sarwar, murder, Chandrapur, Digras,
चंद्रपूर : ‘या’ कारणातून हाजी सरवरची हत्या; नागपूर, दिग्रसमध्ये शिजला कट
stade de France Stadium Sports quality Paris Olympics with a spectacular and breathtaking closing ceremony after 15 days of exhibition sport news
नेत्रदीपक सोहळ्यासह ऑलिम्पिकला अलविदा
Varanavati is relaxed due to the capture of the python while the Karnal area is frightened by the rampage of the leopard
अजगर पकडल्याने वारणावती निर्धास्त, तर कर्नाळ परिसर बिबट्याचा वावराने भयभीत

सुशील शिवाजी जगताप (४०, रा. लुधियाना) व हेमंत ठोंबरे (४१, रा. लुधियाना, पंजाब) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात कुशल सिंग रेसपाल सिंग (५७) हा व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे तिघे मित्र असून, कपड्याचे व्यापारी आहेत. इनोव्हा कार (क्र. पीबी- २३ क्यू – ९४५६) ने ते जळगाववरून कामानिमित्त यवतमाळला आले होते. बुधवारी सायंकाळी यवतमाळवरून नागपूरला निघाले.

आणखी वाचा-तलाठी भरतीत घोटाळ्याची व्याप्ती वाढली, लातूर येथील परीक्षा केंद्राच्या मालकाचे नातेवाईक टॉपर!

दरम्यान वर्धा जिल्ह्यातील शिरपूरजवळील वर्धा नदीवरील पुलाजवळ एका ट्रकला ओव्हरटेक करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगातील कार पुलावरून थेट खाली नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. याबाबत पुढील तपास कळंब येथील ठाणेदार दीपमाला भेंडे करीत आहेत. हा अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंजाबमध्ये त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली.