नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच वेगवेगळ्या मुद्यांवरून लक्ष्य करीत असल्याचे दिसून येते. नागपुरात मंगळवारी प्रदेश काँग्रेसची विस्तारित कार्यकारणीची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देखील पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्याची संधी त्यांनी सोडली नाही.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी एक वक्तव्य ऐकत होतो. ते ब्राझीलच्या निवडणुकीवर बोलत होते. ब्राझीलमध्ये निवडणुकीत पराभव झालेल्यांनी तेथील राष्ट्रपती भवन आणि संसद भवनावर हल्ला केला. अशा प्रकारचा हल्ला लोकशाहीसाठी बरोबर नाही असे पंतप्रधान सांगत होते. पण, त्यांनी ब्राझीलच्या परिस्थितीवर बोलण्यापेक्षा भारतात सध्यास्थिती आहे. त्यावर आपली भूमिका मांडली पाहिजे.

Parambans Singh Romana on Narendra Modi
“आज ते असतील तर उद्या आपणही…”; मोदींच्या ‘त्या’ विधानावरुन शिरोमणी अकाली दल आक्रमक
ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
EKnath Shinde and Uddhav Thackeray (1)
“दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा अन् झेंडाही नाही, त्यांच्यामुळे काँग्रेसची…”, मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला

हेही वाचा >>> “पक्षहिताला कुणी बाधा पोहचवत असेल तर सावधान…”, काँग्रेसमध्ये लवकरच मोठ्या बदलांचे नाना पटोलेंचे संकेत

आज भारतामध्ये लोकशाहीचे वातारण राहिले नाही. मोदी सरकार आणि न्यायलालिका यांच्यात भांडणे सुरू आहेत. या काळात निवडणूक आयोग आणि प्रशासकीय व्यवस्था सुरक्षित नाही. सरकारने प्रत्येक संविधानिक संस्था खिळखिळ्या करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा अवस्थेत लोकशाही टिकून राहणे कठिण आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी लोकशाही वाचली पाहिजे म्हणून भारत जोडो यात्रा काढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या लोकशाहीवर बोलण्याआधी भारताच्या आजच्या परिस्थतीवर भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी आहे.