नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराजांचा नागपुरात ११ जानेवारीपर्यंतच कार्यक्रम असल्याची माहिती समाज माध्यमांवर आधीच आयोजकांनी दिली होती. महाराजांचा १७ जानेवारी ते २३ जानेवारीपर्यंत रायपूरला कथेचा कार्यक्रम आहे. त्यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते चंदन गोस्वामी यांच्यामार्फत पाठवण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.

महाराज नागपूरहून पळाले, असा आरोप काहींनी केला होता. असा आरोप करून भक्तांच्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रयत्न केला आहे. बागेश्वर धाम कमिटीने कार्यक्रमाचे दोन दिवस कमी करण्याची तीन कारणे आहेत. त्यापैकी एक महाराजांचे ज्येष्ठ गुरू श्री रामभद्राचार्यजी यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस महाराज अनेक वर्षांपासून गुरूंसोबतच साजरा करतात. दुसरे कारण गधा धामजवळ आशियातील सर्वात मोठे कॅन्सर हॉस्पिटल बांधण्याबाबत बैठक, तिसरे कारण इतर ठिकाणी कथा आयोजित करून तेथील भाविकांना कथेचा लाभ देणे हे आहे. त्यासाठीच नागपुरातील कार्यक्रमाचे दोन दिवस कमी करून त्याची पूर्वकल्पना समाज माध्यमांवर दिली गेली होती, असेही या पत्रकात नमूद आहे.

Shahu Vichar Darshan Padyatra, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, Rajarshi Shahu Maharaj s Centenary Golden Jubilee , Centenary Golden Jubilee, Rajarshi Shahu Maharaj Kolhapur, Kolhapur, dr jai singh rao pawar,
शाहू विचार दर्शन पदयात्रेद्वारा विविधांगी कार्याचा जागर
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम

हेही वाचा >>> विश्लेषण: ‘अंनिस’ने नागपूरमध्ये आक्षेप घेतलेले धीरेंद्र कृष्ण महाराज आहेत कोण? हा वाद काय?

रायपूरला जा, महाराज उत्तर देतील!

महाराजांचा १७ जानेवारी ते २३ जानेवारीपर्यंत रायपूरला कथेचा कार्यक्रम आहे. कुणाला महाराजांबाबत काही तक्रार असल्यास ते येथे त्यांना प्रश्न विचारू शकतात. ते येथे तक्रारीला उत्तर देतील यासाठी आयोजन समिती प्रयत्न करणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे. महाराजांची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईबाबत विधी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात असल्याचेही या पत्रकात नमूद केले आहे.