गडचिरोली : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी ठार झालेत. यात तीन महिलांचा समावेश आहे. गडचिरोलीपासून १५ ते २० किलोमीटर अंतरावरील नारायणपूरच्या कांकेर सीमावर्ती भागात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली.

छत्तीगडमधील नारायणपूर पोलीस नक्षलविरोधी अभियान राबवित होते. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीदेखील गोळीबार केला. यात १० नक्षलवादी ठार झाले. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. यात तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. याशिवाय एके ४७ सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

dhule police alerted after sexual abuse case increased in country and state
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धुळ्यातील सर्व ठाण्यांमध्ये आता पोलीस दादा, पोलीस दीदी
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Low pressure belt, Konkan coast, Heavy rain Konkan,
कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा; कोकण व गोवामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार
Gujarat ships stuck at devgad
सावंतवाडी: हवामान खात्याच्या येलो अलर्टमुळे गुजरातच्या १०० नौका देवगड बंदरात
The result of the bandh in the western part of Malegaon to protest the atrocities against Hindus in Bangladesh nashik
मालेगावातील पश्चिम भागात बंदचा परिणाम
Nagpur, gold prices, gold prices rises in nagpur, silver prices, bullion market, Union Budget,
नागपूर : सोन्याच्या दरात मोठे बदल; ग्राहकांमध्ये चिंता वाढली…
chhagan bhujbal targeted in activist manoj jarange s in peace rally for maratha reservation in nashik
मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीत छगन भुजबळ लक्ष्य; नाशिकमध्ये फेरीच्या प्रारंभापासून भुजबळांविरोधात घोषणाबाजी
Varanavati is relaxed due to the capture of the python while the Karnal area is frightened by the rampage of the leopard
अजगर पकडल्याने वारणावती निर्धास्त, तर कर्नाळ परिसर बिबट्याचा वावराने भयभीत

हेही वाचा…बुलढाणा : १८२ गावांत पाणी पेटले! अडीच लाख ग्रामस्थांचे हाल, ५ तालुक्यातील ४६ गावांना टँकरने पाणी पुरवठा

जिल्ह्यात हाय अलर्ट

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. सीमावर्ती भागांमध्ये नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले असून यंत्रणा सजग झाली आहे.

हेही वाचा…यवतमाळ : दीड वर्षापूर्वीच्या हल्ल्याचा बदला; युवकाला चाकूने भोसकले

मृतांची ओळख पटली नाही

या घटनेतील मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्यात अद्याप सुरक्षा यंत्रणेला यश आले नाही. यातील काही नक्षलवादी हे गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित असल्याचा संशय आहे. अबुझमाड जंगलातील नक्षल कारवाईत या सर्वांचा सहभाग असू शकतो असा छत्तीसगड पोलिसांचा कयास आहे.