मंगेश राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलामुलींचे अपहरण करणे, पळवून नेण्याचे प्रमाण राज्यात दिवसेंदिवस वाढत असून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत दाखल गुन्ह्य़ांमधील ७ हजार ३३० मुलामुलींचा शोध अद्यापही लागलेला नाही. या मुलामुलींचा  शोध कसा लागणार, पोलीस यंत्रणेने गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पूर्ण करून  जबाबदारी झटकून दिली का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

लग्न, घरकाम, बलात्कार, खंडणी मागणे आदींसाठी मुलामुलींचे अपहरण करण्याचे प्रमाण जास्त आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, राज्यात २०१९ मध्ये १२ हजार १३० जणांचे अपहरण करण्यात आले. त्यापैकी ११ हजार ७५३ हे १८ वर्षे वयोगटातील मुलेमुली होत्या. त्यापैकी ७ हजार ३३० मुलेमुली अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला  यश आलेले नाही.

गुन्ह्य़ात झालेली वाढ

वर्ष                  गुन्हे

२०१७         १०३२४

२०१८         ११४४३

२०१९         १२१३०

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in kidnappings and kidnappings in the state abn
First published on: 16-12-2020 at 00:16 IST