वर्धा : दहावीचा निकाल तर लागला, आता उत्सुकता आहे ती अकरावीच्या प्रवेशाची. पहिला टप्पा आटोपला. त्यात आतापर्यंत एक लाख ४६ हजार २४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आता निकाल जाहीर झाल्यानंतर दुसरा टप्पा अपेक्षित आहे. मात्र या बाबत अधिकृत घोषणा झाली नाही. या विषयीचे वेळापत्रक शनिवारी दुपारी तीन वाजता जाहीर केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठ जूनपासून प्रवेश अर्जातील दुसरा भाग भरण्यास उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. केंद्रीय ऑनलाईन प्रणालीतर्फे अकरावीचे प्रवेश केल्या जाणार आहे. सध्या पहिल्या फेरीचे नियोजन केले जात असून पुढील दोन फेऱ्यांचे नियोजन नंतर घोषित करणार असल्याचे अधिकारी सांगतात. अकरावी प्रवेशासाठी दुसऱ्या भागात विद्यार्थी कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरतात यावर त्यांचा प्रवेश अवलंबून असतो. म्हणून हा टप्पा केव्हा सुरू होणार याबाबत विद्यार्थी व पालक यांच्यात कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know when the second phase of 11th admission will start pmd 64 ysh
First published on: 03-06-2023 at 11:33 IST