नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार असो यांच्याशी थेट भिडण्यास मागे पुढे पाहत नाही, अशी त्यांची ओळख झाली आहे. पटोले म्हणतात, की आमची लढाई कोण्याएका अडाणी सोबत नव्हे तर मोदानी सोबत आहे. संपूर्ण देशाची संपत्ती एका व्यक्तीला लुट देण्याचे धोरण केंद्रातील सरकारचे आहे. त्याविरोधात आम्हाला बोलण्याचा अधिकारी आहे, असे पत्रकार परिषदेत ठणकावून सांगताना महाराष्ट्रात आधी ईडी सरकार होते आता ‘ईडा’ सरकार असल्याचे म्हटले आहे. नंतर त्याचा खुलासा करताना ते म्हणाले, ‘ई’ म्हणजे एकनाथ शिंदे, ‘डी’ म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि ‘ए’ म्हणजे अजीत पवार होय. या तिघांचे सरकार म्हणजे “ईडा” सरकार, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Sep 2023 रोजी प्रकाशित
“महाराष्ट्रात आता ‘ईडा’ सरकार”; नाना पटोलेंची टीका म्हणतात, “लढाई अडाणी नव्हे तर मोदानीशी…”
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार असो यांच्याशी थेट भिडण्यास मागे पुढे पाहत नाही, अशी त्यांची ओळख झाली आहे.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर
Updated: 
First published on: 07-09-2023 at 16:56 IST
TOPICSएकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisनरेंद्र मोदीNarendra Modiनाना पटोलेNana Patoleभारतीय जनता पार्टीBJP
+ 1 More
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole criticism of bjp government nanrendra modi and shinde fadanvis ajit pawar govt rbt 74 ysh