गोंदिया : जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली आहे. अहंकार आणि आम्ही जे केले तेच बरोबर, अशी भाजपाची मानसिकता झाली आहे. यामुळेच अनेक नेते पुढच्या काळात भाजपा सोडतील यावेळी केंद्रात भाजपाचे, मोदींचे सरकार येणार नाही. मग महाराष्ट्र आणि देशात भाजपाची अवस्था काय होईल, ते चित्र स्पष्ट आहे, असे नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले गोंदिया येथे निवडणूक प्रचार दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीच्या यादीत मुस्लीम उमेदवारांचे नाव का नाही? असा प्रश्न केला असता पटोले म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचे तिकीट वाटप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुढे आणखी काही नावे पहायला मिळतील. आमच्याकरिता तो मुद्दाच नाही. भाजप आणि त्यांचे नेते राज्यात आणि देशात महागाई, बेरोजगारीवर चर्चा का करत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा का करत नाही, गरिबांच्या प्रश्नावर चर्चा का करत नाही.

wardha lok sabha seat, devendra fadnavis, not attend, campaign rally , discussion started, bjp, less crowd, sharad pawar, rally, marathi news, maharashtra politics,
शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…
BJP's sitting MP Unmesh Patil from Jalgaon joined Shiv Sena UBT on Wednesday .. Express Photo by Amit Chakravarty
“मला त्या पापात वाटेकरी व्हायचं नाही”, ठाकरे गटात प्रवेश करताच खासदार उन्मेश पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप
Uddhav thackeray
ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरला, ‘या’ महिला नेत्याला दिली संधी
What Devendra Fadnavis Said?
“आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा…वर्धा : आघाडीचे आधी रॅली मग अर्ज, तर युतीचे आधी अर्ज मग रॅली; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज का केला बदल ?

सर्वसामान्यांशी निगडीत नसलेले मुद्दे माध्यमांद्वारे समोर आणायचे आणि मूळ मुद्यांपासून लोकांना डायव्हर्ट करायचे, भाजपने मागील दहा वर्षे हाच धंदा केला. पण आता असे चालणार नाही. मतदारांनी मानसिकता बनवली आहे आणि आता ‘इंडिया’ आघाडीला निवडून द्यायचा, असा मानस मतदारांचा आहे. मी आपल्या सभांमधून महाविकास आघाडीला निवडून द्यायचे आवाहन जनतेला करत आहे. मतदारांनी भाजपाच्या धर्म-जाती या मुद्यांपलीकडे मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही पटोले म्हणाले.