लोकसत्ता टीम

नागपूर : २३ सप्टेंबरला नागपूरमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले आणि लाखोंच्या वस्तू खराब झाल्या. यामुळे शासनातर्फे दिली जाणारी दहा हजार रुपयांची मदत अतिशय तोकडी आहे. पुरग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदनपत्र नागपूरमधील पूरग्रस्तांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. येत्या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याबाबत जनहित याचिका दाखल करण्याचा मानस देखील पूरग्रस्तांनी व्यक्त केला आहे.

ministers given permission till august 30 for transfers within department ahead of poll
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांना ‘मोकळे रान’; बदल्यांसाठी ३० ऑगस्टपर्यंत मुभा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Raj Thackeray, Gondia, Raj Thackeray on Badlapur,
“बदलापूरची घटना मनसे पदाधिकाऱ्यांमुळे उघड,” राज ठाकरे यांचा दावा
Badlapur School Case Live Updates in Marathi
लोकप्रकोप : शाळेत मुलींवरील अत्याचारानंतर बदलापुरात संतापाची लाट; पालक, नागरिकांच्या आंदोलनामुळे रेल्वे सेवा दहा तास ठप्प
Badlapur Crime News : School Male Cleaner Abuse Girls in Badlapur| Badlapur News Updates in Marathi After the incident in Badlapur the district collector ordered to check the Sakhi Savitri committees in schools
Badlapur School Case : बदलापूरातील घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना आली जाग; शाळांमध्ये सखी सावित्री समित्या आहे की नाही, हे तपासण्याचे आदेश
Kalyan, Dombivli, online investment fraud, Information Technology Act, Manpada police, fraud news, latest news, stock market fraud,
डोंबिवली, कल्याणमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीतून सव्वा कोटीची फसवणूक
ST bus service, ST bus, ST bus maharashtra,
तोट्यातील ‘एसटी’ नफ्याच्या उंबरठ्यावर, झाले असे की…
new cyber police station, Thane
ठाण्याला नवे सायबर पोलीस ठाणे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटनाची शक्यता

आणखी वाचा-चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्यांना कारागृहातून घेतले ताब्यात; दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात नागरिकांनी उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांची समिती स्थापित करून पूर का आला याबाबत न्यायिक चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. अंबाझरी तलावाच्या दुरवस्थेबाबत शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अंबाझरी तलावाचा ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ ( संरक्षणात्मक अंकेक्षण) करण्यात यावा, नाग नदीच्या प्रवाहासाठी उपाययोजना राबविण्यात यावी, महामेट्रोद्वारा अनधिकृतपणे तयार करण्यात आलेल्या एक्वा पार्कला तोडण्यात यावे तसेच विवेकानंद स्मारकाची जागा बदलण्यात यावी, अशी मागणी निवेदनपत्रात करण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने पुढील कारवाई करिता निवेदनपत्र आपदा निवारण मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.