केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर : पाणी वाचवा, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले तर देशात पाणीटंचाई जाणवणार नाही. पाणी आणि  पर्यावरण शुद्ध राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून पुन्हा वापरा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Konkan Planned Policy Continuity Major lack of enforcement Maharashtra Day 2024
कोकण: अभाव नियोजनबद्ध धोरण सातत्याचा..
rbi kotak mahindra bank marathi news, kotak bank latest marathi news
विश्लेषण: रिझर्व्ह बँकेची कोटक महिंद्र बँकेवर कारवाई काय? त्याचा बँक ग्राहकांवर काय परिणाम होणार?
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका

इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी एका आभासी कार्यRमाच्या माध्यमातून गडकरी यांनी संवाद साधला. ज्ञानाचे आणि कचऱ्याचे संपत्तीत रुपांतर करणे ही आता देशाची गरज आहे. काहीच कचरा नसतो, त्याचा कुठे ना कुठे उपयोग होत असतो. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाची गरज आहे. गावातले पाणी गावात, शेतातले शेतात आणि घरातले पाणी घरातच राहिले तर पाण्याची पातळी वाढेल आणि पाणीटंचाईपासून सुटका होईल. कृषी क्षेत्रात ठिबक सिंचनाचा वापर झाला तर पाणी वापरात बचत होईल. नवीन संशोधन, तंत्रज्ञानामुळे उत्पादनात कोणताही समझोता न करता खर्चात बचत करणे शक्य झाले आहे. सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी ही देशाची गरज आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून बायो सीएनजी निर्माण केला. या सीएनजीवर नागपुरात महापालिकेच्या बसेस धावत असल्याचेही गडकरी म्हणाले.