नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक सल्लागार परिषदेवर विदर्भाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्राला एक ‘ट्रिलियन’ची अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी आर्थिक सल्लागार परिषद स्थापन केली. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. समितीत, रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अदानी, अदानी पोर्टचे सीईओ करण अदानी यांच्यासह या १९ सदस्यांचा समावेश आहे. मात्र, परिषदेत विदर्भाला प्रतिनिधित्व नाही. विदर्भात नागपूर आणि अमरावती हे दोन मोठे महसूल विभाग येतात.

Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

हेही वाचा >>> ‘मॅट्रिमोनिअल वेबसाईट’वरून ओळख वाढविताना सावधान!

परिषदेत विदर्भाचा एकही विभागीय आयुक्त दर्जाचा अधिकारी किंवा स्थानिक उद्योजकाचा समावेश नाही. याबाबत विदर्भवाद्यांमध्ये रोष आहे. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के जनता ही विदर्भात राहते, त्या प्रमाणात विदर्भाला प्रतिनिधित्व मिळणे अपेक्षित आहे. मात्र, याचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे सल्लागार परिषदेवर विदर्भाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी विनंती राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.