चिखली तालुक्यातील रोहडा येथील तपोवन देवी मंदिर परिसरातून बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय बालिकेचा तब्बल २८ तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेहच हाती लागला. तिचा चेहरा दगडाने ठेचलेला आढळून आल्याने खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झाले आहे.

हेही वाचा >>> नागपूर : समृद्धी’वर अतिवेगाने वाहन चालवाल तर…खबरदार! ५०० वाहनांवर कारवाई

muslim community protest against neha hiremath murder
मुस्लिम समाजाने केला नेहा हिरेमठ हत्येचा निषेध
mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते

राधिका विलास इंगळे (६) असे मृत बालिकेचे नाव आहे. मूळची बाळापूर (जि. अकोला) येथील रहिवासी असलेल्या या दुर्देवी बालिकेचा मृतदेह तपोवन मंदिर परिसरातील मागील डोंगराळ भागात आढळून आला. बाळापूर येथील रहिवासी विलास इंगळे लग्नानिमित्त सहपरिवार चिखली परिसरात आले होते. १२ मे रोजी सकाळी ११ वाजतापासून राधिका बेपत्ता होती. पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी कसोशीने प्रयत्न केले. दरम्यान, आज शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास तपोवन देवी मंदिराच्या मागील भागात तिचा मृतदेह आढळून आला. तिचा चेहरा पूर्णपणे ठेचलेला आहे. या निष्पाप बालिकेची निर्घृण हत्या कोणी व कोणत्या हेतूने केली, याचा शोध घेण्याचे आव्हान चिखली पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.