अकोला: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजसेवक गजानन हरणेंनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला. या आंदोलनाला विविध समाजाने पाठिंबा दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे झाली. गेल्या चार दिवसापासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करीत आहे. शासनाने त्यांना दिलेले आश्वासन पाळले नसल्यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण झाला. आरक्षणाच्या मागणीला व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजसेवक गजानन हरणे यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला.

Balasaheb Thorat, kolhapur, Democracy,
देशातील लोकशाही, पुरोगामी विचार धोक्यात; बाळासाहेब थोरात यांची टीका
MIM, Kolhapur, Hindu organizations,
कोल्हापुरात ‘एमआयएम’चा पाठिंबा घेण्यामागे कोणते षडयंत्र दडले आहे; हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सवाल
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

हेही वाचा… राज्यासह देशात गुलाबी थंडी, किमान तापमानात घट; नोव्हेंबरमध्ये धुकेही वाढणार

शासनाने तात्काळ मागणी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रश्नावर मराठा तरुणांनी आत्महत्या करण्यापेक्षा संबंधित जिल्हाधिकारी, तहसील, ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषण, साखळी उपोषण सुरू करून शासनास जागृत करावे, असे आवाहन हरणे यांनी केले आहे.