विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैदराबादशी जवळचा व्यापारी संबंध आहे. त्यामुळे नागपूर ते हैदराबाद दरम्यान ‘वंदे भारत एक्सप्रेस’ लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून ही मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांसाठी जवळचे सगळ्यात मोठं शहर आहे. तसेच ते एक औद्योगिक शहर आहे. दुसरीकडे हैदराबाद हे दक्षिणेकडील या भागातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र आणि औद्योगिक शहर आहे.

सध्या नागपूर आणि हैदराबादला जोडणार्‍या २२ रेल्वे गाड्या आहेत. पण ५७५ किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी एक वेगवान रेल्वे असणे आवश्यक आहे. नागपूर-हैदराबाद मार्गावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे सुरू झाल्यास नागपूरसोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांनाही ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा फायदा होईल, असंही मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा- PHOTOS : ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ची अहमदाबाद-मुंबई मार्गावर चाचणी

या भागात येणारे पर्यटक, व्यापारी आणि उद्योजक यांच्या सोयीसाठी नागपूर-हैदराबाद या दोन शहरांना जोडणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar demand vande bharat express between nagpur hyderabad write letter to railway minister rmm
First published on: 07-12-2022 at 18:45 IST