बुलढाणा : सोमवारची रात्र जिल्ह्यासाठी प्रामुख्याने रब्बी पिकांसाठी प्रलयकारी ठरली! जोरदार अवकाळी पावसासह गारपिटीने रब्बी पिके, भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान झाले. निसर्गाच्या या प्रकोपातून मुके जीवसुद्धा वाचले नसल्याचे दुर्देवी वृत्त आहे.

जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत सोमवारी रात्री उशिरा मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. यापाठोपाठ ठिकठिकाणी गारांचा वर्षाव झाला. बोराच्या आकारापासून मोठ्या आकाराच्या गारांच्या वर्षावाने पिके, भाजीपाला जमीनदोस्त झाला. सोंगलेल्या पिकांची अतोनात हानी झाली.

Jalgaon, Private Bus Overturns in jalgaon, Five Injured, five injured in Bus Overturns, Guardian Minister Gulabrao, Relief Efforts, Minister Gulabrao Patil Leads Relief Efforts,
जळगाव जिल्ह्यात खासगी बस उलटून पाच प्रवासी गंभीर; मंत्री गुलाबराव पाटील यांचे मदतकार्य
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
heatwave in mumbai and thane mumbai
मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर

हेही वाचा – सेल्फीस नकार देत पालकाने मुख्यमंत्र्यांना केला थेट सवाल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

चिखली देऊळगाव राजा मार्गावर निसर्गाचे तांडव पहावयास मिळाले. रात्री सव्वानऊच्या सुमारास गारपिटीला सुरुवात झाली. हा तडाखा अनेक मिनिटे सुरू असल्याने मार्गावर व आजूबाजूच्या शेतात गारांचा खच पडला. सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांगरा, दुसरबीड, लोणारमधील बीबी, किनगाव जट्टू, बीबी, गोवर्धन, देवा नगर या गावात असेच चित्र होते. शेगाव तालुक्यातील भोनगाव येथे अर्धातास गारांचे तांडव चालले. परिणामी रब्बी पिके, भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले. यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले आहे. शेतातील गहू हरबरा काढणीला आला होता त्याचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.

हेही वाचा – निवृत्त न्यायाधीश २० हजारांत भरणपोषण कसे करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र शासनाला सवाल

बगळ्यांचे बळी

झाडावर गाढ झोपेत असलेल्या पक्ष्यांनाही गारपीट व अकवाळी पावसाचा फटका बसला. झाडावरून खाली कोसळल्याने अनेक बगळ्यांचा करुण अंत झाला.