scorecardresearch

Premium

मनमाडकरांना टंचाईत काहिसा दिलासा, करंजवण धरणातून आवर्तन

शहराला आता पूर्ववत १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.

karanjwan dam, Manmad, water scarcity, heat, summer
मनमाडकरांना टंचाईत काहिसा दिलासा, करंजवण धरणातून आवर्तन ( छायाचित्र – लोकसत्ता टीम )

मनमाड : ऐन उन्हाळ्यात मनमाड शहराला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. वाघदर्डी धरणातील जलसाठा खालावत चालल्याने शहराला महिन्यातून एकदा पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर करंजवण धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. शहराला आता पूर्ववत १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.

आठवडाभरात हे पाणी पाटोदा साठवणूक तलावात येईल. गेल्या महिन्यात शहराला पाणी पुरवठा करणार्या वाघदर्डी धरणातील पाणी साठ्यात मोठी घट झाली. पालखेड धरणात अपुरा पाणीसाठा असल्यामुळे पालखेड धरणातून मनमाडसाठी पाणी सोडता येत नव्हते. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहराला १० ते १२ दिवसाआड ऐवजी थेट २० ते २१ दिवसांनी म्हणजे महिन्यातून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊन पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ मनमाडकरांवर आली.

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

हेही वाचा… मनमाड : मातेची बालिकेस मारहाण, समाजसेवकाच्या सतर्कतेमुळे सुटका

हेही वाचा… ठेवीदारांना पैसे देणेही कठीण, एनपीए १३४२ कोटींवर; अडचणीतील जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी

या पार्श्वभूमीवर करंंजवण धरणातून मनमाड आणि येवला शहरासाठी आवर्तन सोडण्यात आले. लवकरच पालखेड धरणाद्वारे हे पाणी नगरपालिकेच्या पाटोदा साठवणूक तलावात येणार आहे. त्यामुळे टंचाईतून मनमाडकरांची सुटका होईल. करंजवण धरणातून सोडलेले पाणी पालखेड धरणातून मनमाड व येवला शहरासाठी देण्यात येणार आहे. तब्बल दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर आवर्तनाचे पाणी पालखेड धरणातून मनमाड आणि येवला शहराला मिळणार आहे. शहरातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेऊन पालखेडचे आवर्तन सोडावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. आमदार सुहास कांदे यांनी प्रयत्न केले. त्यानंतर पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मनमाड शहरासाठी मंजूर झालेल्या करंजवण मनमाड पाणी योजनेचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. लवकरच मनमाड शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटणार असल्याचे कांदे यांनी म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 11:57 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×