लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: शेतीकामे करण्यास मजूर मिळत नाही. काही ठिकाणी जास्तीचे पैसे देऊनही आहे त्या शेतातून मजूर पळविण्याचे प्रकार घडताना दिसून येतात. शेतीकामे करण्यासाठी शेतकऱ्यांना मजुरांची मनधरणीही करावी लागते. आता यावर उपाय म्हणून येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शेतीकामांसाठी यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. हा यंत्रमानव शेतीकामे कमीत कमी वेळात सहजरीत्या करु शकतो, असा विद्यार्थ्यांचा दावा आहे.

decreasing students in coaching capital kota
विश्लेषण : ‘कोटा फॅक्टरी’ला घरघर? कोचिंग शहरातील विद्यार्थी संख्या घटण्याची कारणे कोणती?
Students and parents are confused by the new caste verification decision for admission to engineering, medical and other professional courses Mumbai
जात पडताळणीच्या नव्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालक संभ्रमात; एसईबीसीअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारे विद्यार्थी गोंधळात
Extension for registration of Engineering MBA Agriculture MCA courses Mumbai
अभियांत्रिकी, एमबीए, कृषी एमसीए अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
11th admission process Even after the third regular round 1 lakh students have no college Mumbai
अकरावी प्रवेश प्रक्रिया :तिसऱ्या नियमित फेरीनंतरही १ लाख विद्यार्थ्यांना महाविद्यालय नाही
engineering Diploma, meritorious students,
दहावीनंतरच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे गुणवंतांचा ओढा, शंभर टक्के गुण मिळवलेले किती विद्यार्थी?
JEE, jee result, jee main,
जेईई मेन्स परीक्षेत घोळ? विद्यार्थ्याला एकाच ‘रोल नंबर’वर वेगवेगळे गुण
Case of NEETUG paper leak Four more students arrested in Bihar
बिहारमध्ये आणखी चार विद्यार्थ्यांना अटक; ‘नीटयूजी’ पेपर फुटीचे प्रकरण, पाटणा ‘एम्स’मधील वसतिगृहाच्या खोल्याही ‘सील’
BARTI, Babasaheb Ambedkar Research and Training Institute, Nagpur, JEE, NEET, fake documents, training contract, tender process, SC students, Students Rights Association of India, Sunil Vare, UPSC Academy, Spectrum, Career Campus,
‘जेईई’,‘नीट’प्रशिक्षणाचा अनुभव नसणाऱ्या संस्थांची तपासणी होणार, महासंचालकांचे कारवाईचे आदेश

येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीच्या ऐश्वर्या लुणावत, शुभांगी पाटील, दुर्गेश तायडे आणि प्रतिभा पाटील या विद्यार्थ्यांनी शेतीकामे करणाऱ्या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. यंत्रमानवाच्या निर्मितीसाठी अवघा दोन हजार रुपये खर्च आला आहे. या विद्यार्थ्यांनी सलग दोन वर्षे संशोधन करून पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव, पिकाचा रंग, उंची आणि पीक वाढीस कोणकोणते अन्नद्रव्य, खतांची गरज आहे, याचे अचूक विश्लेषण करणारे सॉफ्टवेअर विकसित केले. त्यानंतर त्यांनी चारचाकी स्वयंचलित यंत्रमानव तयार केला.

हेही वाचा… नाशिक: पंचवटीत अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिसांवर दगडफेक

यंत्रमानवात अल्ट्रासॉनिक सेन्सर, ऑर्डिनो बोर्ड, जंप वायर, बॅटरी, जीपीएस कंट्रोलर, वॅाटर कंट्रोलर, नऊ व्हॅटची बॅटरी, मायक्रो कंट्रोलर आदी बसविण्यात आले आहे. हा यंत्रमानव जीपीएस सिग्नलद्वारे बियाणांची तपासणी करून त्याची माहिती ठेवेल. तो सौरऊर्जेवर काम करणारा आहे. पिकावरील रोगांचा प्रादुर्भाव आणि त्या पिकाला आवश्यक असणाऱ्या खताच्या मात्रा याची माहिती देईल. हा चारचाकी स्वयंचलित यंत्रमानव पिकात फिरून पाहणी करतो. एरंडोल तालुक्यात शेतकऱ्यांना या यंत्रमानवाचे प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात आले.