नाशिक – नाशिकरोड विभागातून जाणाऱ्या अत्यंत गजबजलेल्या नाशिक-पुणे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अवजड वाहनांविरूध्द वाहतूक विभागाने कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पुण्यात मनसे फुटीच्या उंबरठय़ावर?; बंडखोरांचे मतपरिवर्तन करण्याचे धनुष्य समन्वय समितीकडे

Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
pmp and rto taken joint action against 1620 errant rickshaw drivers
बसस्थानक परिसरात रिक्षा उभी करणाऱ्या १,६२० चालकांवर कारवाई, पीएमपी, आरटीओची मोहीम
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

हेही वाचा >>> विरंगुळ्यासाठी राज ठाकरे नातवासोबत थेट शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर येतात तेव्हा; सोशल मीडियावर फोटो Viral

नाशिकरोड परिसरात वाहतूक कोंडी वाढली आहे. वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अत्यंत दाट वस्ती असलेल्या, परिसरातील शाळा, व्यावसायिक संकुले, नागरी वस्त्या, मुद्रणालय, औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या संख्येने रहदारी असलेल्या या रस्त्यांवर अवजड वाहनांच्या वाढलेल्या वाहतुकीमुळे अनेक अपघात झाले आहेत. अलिकडेच पंचवटीत मिरची हॉटेलजवळ झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. शाळा-महाविद्यालये, कर्मचारी आस्थापनांच्या भरण्या-सुटण्याच्या वेळी रहदारीत वाढ होऊन व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण होऊन वाहतूक सिग्नलचे नियोजन ढासळते. परिणामी बिटको पॉईंट, दत्त मंदिर, बिटको महाविद्यालय, शिखरेवाडी कॉर्नर, म्हसोबा मंदिर, सेंट झेवियर्स स्कूल, उपनगर सिग्नल येथे अवजड वाहनांच्या लांबचलांब रांगा लागून सर्वसामान्यांना रस्ता ओलांडतांना आणि प्रवास करतांना आपला जीव सांभाळत प्रवास करावा लागतो.

हेही वाचा >>> विश्लेषण: रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढतं? प्री- डिनरने वजन नियंत्रणात मदत होते का? जाणून घ्या

ज्यांच्यावर नियम लागू करण्याची जबाबदारी आहे त्या परिवहन अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने अवजड वाहनांचा मुक्त संचार या रस्त्याने सुरू असल्याचा आरोपही मनसेने केला आहे. परिसरातील मोटवानी रोड, जेलरोड या कॉलनी रस्त्यांवरूनही अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू आहे. या वाहनांमुळे मोठया प्रमाणावर धूळ उडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अपघात नित्याचे झाले आहेत. प्रशासनाने वाहतूक नियंत्रण सिग्नलच्या वेळेचे नियोजन, रहदारीच्या वेळेस वाहतूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून सर्वसामान्य जनतेचा जीव वाचवावा, अन्यथा या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेतर्फे परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. याप्रसंगी नाशिकरोड विभागाचे अध्यक्ष विक्रम कदम, जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणे, कामगार सेना चिटणीस प्रकाश कोरडे आदी उपस्थित होते.