लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : जिल्ह्यातील गिरणा, हतनूर व वाघूर या मोठय़ा प्रकल्पांतील साठा दिवसेंदिवस कमी होत असून, दुसऱ्या बिगरसिंचन आवर्तनामुळे निम्म्या जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा प्रकल्पातील साठा ३१ टक्क्यांवर आला आहे. हा साठा नऊ  टक्क्यांनी घटला असून, एप्रिलमध्ये साठा २२-२३ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील ३१ गावांसाठी ३५ टँकर सुरू आहेत.

It is feared that most of the villages will be affected by the development projects in Thane district even during the rainy season
ठाणे जिल्ह्यात ‘समृद्धी’ने पुराची अवकळा
Heavy rain throughout the day in Yavatmal district
यवतमाळ जिल्ह्यातील २४ मंडळांत अतिवृष्टी, संततधार सुरूच
Bulls in Satara District for Bendur Festival Bulls available in large quantities for sale in Satara District
सातारा जिल्ह्यात बेंदूर बाजार सजला
Heavy Rainfall in Thane District, Knee-deep water accumulated near kamwari river house, Severe Flooding in Bhiwandi, Disrupts Life and Commerce, Heavy Rainfall in Bhiwandi, Bhiwandi news, marathi news, latest news,
भिवंडी पावसाचे पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत, कामवारी नदी काठच्या वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले
Buldhana, Collapse, rain, car,
बुलढाणा : जिल्ह्यात कोसळधार! १६ मंडळात अतिवृष्टी; पुरात कार वाहून गेली…
Slight drop in water level in Kolhapur Jambre project was filled to the brim
कोल्हापुरात पाणी पातळीत किंचित घट; जांबरे प्रकल्प काठोकाठ
thane tourism marathi news
ठाणे: पर्यटन अर्थार्जनावर पाणी, जिल्ह्यातील प्रमुख निसर्गस्थळांवर जाण्यास पर्यटकांना यावर्षीही मज्जाव
significant Water Levels increase in Raigad Dams, Water Levels in Raigad Dams, Heavy Rainfall in raigad, marathi news, raigad news, alibaug news,
रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ, पावसाचा जोर वाढल्याने धरणात ४२ टक्के पाणीसाठा

जिल्ह्यातील तीन मोठय़ा व १३ मध्यम प्रकल्पांतील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. जानेवारीत गिरणा धरणातील साठा ४२ टक्क्यांवर होता. फेब्रुवारीत दुसरे आवर्तन सोडण्यापूर्वी हा साठा ३९ टक्क्यांवर होता. आता हा साठा ३१ टक्क्यांवर आला आहे. गतवर्षी हतनूर व वाघूर या प्रकल्पांतील जलसाठा अनुक्रमे ६६.६७ आणि ७७.९१ टक्के होता. यंदा हतनूर व वाघूर या प्रकल्पांतील जलसाठा अनुक्रमे ६७ आणि ७६ टक्क्यांवर आहे. तिन्ही मोठय़ा प्रकल्पांत गतवर्षी ५३.५९ टक्के, तर यंदा तीन टक्क्यांनी कमी अर्थात ४९ टक्के आहे. जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांत गतवर्षी ५०.७७ टक्के व यंदा अवघा ३९ टक्के जलसाठा आहे.

हेही वाचा >>>धुळ्यात मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपचा प्रयत्न

एकीकडे गिरणा प्रकल्पातून चाळीसगाव, पाचोरा, मालेगाव येथील एमआयडीसींना पाणी पुरवावे लागणार असून, दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठीही सुमारे दोनशे गावांसाठी पाणी राखीव ठेवावे लागणार आहे. त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाला आतापासूनच पाण्याबाबत नियोजन करावे लागणार आहे. भोकरबारी मध्यम प्रकल्पांतील जलसाठा अवघ्या सहा टक्क्यांवर, तर अंजनी प्रकल्पातील जलसाठाही १५ टक्क्यांवर आहे. त्यामुळे एरंडोलकरांसमोर टंचाईचे सावट आहे. मार्चनंतर एरंडोल, पारोळा, अमळनेर, धरणगाव, भडगाव, चाळीसगाव, बोदवड या शहरांना टंचाईचे संकट जाणवू शकेल.

जिल्ह्यतील चाळीसगाव, भडगाव, अमळनेर व पारोळा यांसह इतर तालुक्यांतील ३१ गावांच्या घशाला कोरड पडल्याने ३५ टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. प्रत्येक गावात मागणीनुसार पाच ते सहा फेऱ्या टँकरच्या होत आहेत. तसेच जिल्ह्यातील ४३ गावांसाठी ४८ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील टँकर सुरू असलेली गावे

चाळीसगाव तालुक्यातील विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, कृष्णानगर, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राह्मणशेवगे, घोडेगाव, हातगाव भिल्लवस्ती, पिंप्री बुद्रूक, खराडी, डोणदिगर, तळेगाव, न्हावे, ढोमणे, पिंपळगाव, माळशेवगे, शिंदी, चत्रभुज तांडा; भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा, वसंतवाडी; अमळनेर तालुक्यातील तळवाडे, शिरसाळे बुद्रूक, निसडी, लोणपंचम, नगाव बुद्रूक; पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.