उरण: तालुक्यातील फुंडे, डोंगरी व पाणजे या तीन गावांना जोडणाऱ्या मार्गावरील खड्डयांना पावसामुळे तलावांचे स्वरूप आले आहे. याच मार्गातून दररोज येथील नागरिक व प्रवासी वाहने प्रवास करीत आहेत.

त्यामुळे हा रस्ता आहे की, तलाव मार्ग असा सवाल येथील प्रवाशांकडून केला जात आहे. उरण शहराला फुंडे, डोंगरी व पाणजे तसेच जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या मार्ग चिखलमय झाला असून त्याला धोकादायक खड्डे पडले आहेत. या निसरड्या मार्गावरून येथील विद्यार्थ्यांनाही प्रवास करावा लागत असल्याने धोका निर्माण झाला आहे.

Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
nitin gadkari
चावडी: मी प्रचार (नाही) करणार!

हेही वाचा… जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड प्रकिया ३ ऑक्टोबर पासून सुरू होणार; सिडको भवनात दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत कागदपत्रे स्वीकारणार

उरण ते शेवा मार्गावरील वायु विद्युत केंद्र कामगार वसाहती नजीकच्या रस्त्याची खड्डे बुजवून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र या मार्गाने प्रवासी वाहनांबरोबरच डम्पर सारख्या जड वाहनांची वाहतूक सुरू झाली. त्यामुळे या मार्गाला प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाळ्यात भर पडल्याने दीड ते दोन फुटांचे चिखलाने भरलेले धोकादायक खड्डे मार्गातून येथील नागरिक प्रवास करीत आहेत.