वातावरणात वाढलेल्या अचानक उष्णतेमुळे काही प्रमुख भाज्यांची आवक मंदावल्याने फरसबी, वाटाणा, शेवग्याच्या शेंगा, गवार या भाज्यांचे भाव कडाडले आहेत. कोबी, प्लॉवर, टोमॅटो या भाज्या मात्र तुलनेने स्वस्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परतीच्या पावसाने घेतलेली ओढ आणि वातारणात वाढलेला उष्णता यामुळे काही भाज्या महागल्या आहेत. यात गवार ४०ते ४५ प्रति किलो असून वाटाणा मात्र ९० ते १०० रुपये किलो घाऊक बाजारातच विकला जात आहे. त्यामुळे त्याचे किरकोळ बाजारातील दर शंभर रुपयांच्या वर गेले आहेत. याशिवाय शेवग्याच्या शेंगादेखील ४४ ते ५२ रुपये किलो आहेत. भेंडी ३० ते ३२ रुपये किलोने विकल्या जात आहेत. तुर्भे येथील घाऊक बाजारात सर्वसाधारणपणे साडेसहाशे गाडय़ा भाज्यांची आवक होते मात्र शुक्रवारी ही आवक १०० गाडय़ांनी कमी झाल्याने काही भाज्यांचे दर मात्र वाढले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rate of four major vegetables get high
First published on: 27-10-2018 at 02:26 IST