नवी मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोच्या दराने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. परंतु एपीएमसी बाजारात आता टोमॅटोची आवक वाढत असल्याने हळूहळू दर पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे . तर दुसरीकडे कांद्याच्या दरात मात्र किंचितशी वाढ होताना दिसत आहे. घाऊक बाजारात कांदा टोमॅटोच्या दरात चढ-उतार पहावयास मिळत असली तरी किरकोळ बाजारात मात्र चढ्यादरानेच विक्री होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारावर नियंत्रण कोणाचे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सर्व शेतमालाचे दर नियंत्रणाखाली राहावे म्हणून एपीएमसी बाजार समिती अंतर्गत राज्य सरकारच्या वतीने घाऊक दरांवर वचक ठेवला जातो. कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढवल्याने कांद्याचे दर गडगडतील या भीतीने सर्व स्तरातून त्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासन घाऊक बाजारात दाखल होणाऱ्या शेतमालाच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवते, मात्र तोच भाजीपाला किरकोळ बाजारात गेल्यानंतर दुप्पट ते तिप्पट दराने विक्री केला जातो. यावर मात्र कोणाचाही वचक, नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य भाव मिळत नाहीच शिवाय सर्वसामान्यांनाही आर्थिक झळ बसत आहे.

FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Best Selling 7 Seater Car
Innova ना Fortuner मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसमोर सर्वांची बोलती बंद; दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

हेही वाचा… जेएनपीटी साडेबारा टक्केची बैठक रद्द, प्रकल्पग्रस्तांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार?

एपीएमसी बाजारात शुक्रवारी राज्यातील टोमॅटोची आवक वाढली आहे. २० ते २५ गाडीवरून शुक्रवारी बाजारात ३७ गाड्या टोमॅटोची आवक झाली आहे. त्यामुळे टोमॅटोच्या घाऊक दरात आणखीन ८ रुपयांची घसरण झाली असून कमीत कमी १० ते जास्तीत जास्त २० रुपये किलोने टोमॅटो विक्री होत आहे. मात्र दुसरीकडे तेच किरकोळ बाजारात मात्र ४० ते ५० रुपये किलोने दराने विक्री केले जात आहे. तसेच घाऊक कांदा बटाटा बाजारात कांदा प्रतिकिलो १९-२५ रुपये आहे, तेच किरकोळ बाजारात १०-१५ रुपये अधिक दराने विक्री होत असून प्रतिकिलो ३५-४० रुपयांनी विक्री होत आहे. किरकोळ बाजारात चढ्या दराने विक्री होत असून यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ग्राहकांना मात्र लुटले जात आहे.