पालघर : २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सुमारे ५४७.८५ हेक्टर कृषी क्षेत्रफळावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या संदर्भातील सविस्तर पंचनामे करण्याची कारवाई हाती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत.

पालघर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात सुमारे ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यामुळे डहाणू व तलासरी वगळता उर्वरित सर्व सहा तालुक्यांमध्ये कृषी क्षेत्रावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रफळामध्ये भात शेतीचे सुमारे ९० टक्के प्रमाण असून नागली व भाजीपाला लागवडीचे देखील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश बागेश्वर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना कृषी विभाग तसेच संबंधित तहसीलदारांना देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी दिली आहे.

Majority of dams in Nashik district overflow nashik
नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Dengue, Raigad district, Panvel Dengue,
रायगड जिल्ह्यात डेंग्यू बळावला; पनवेल, उरण, पेण, अलिबागमध्ये डेंग्यूचा संसर्ग वाढला
Chandrapur, Sudhir Mungantiwar, crime, political protection, shootings, gang war, illegal businesses, police, Haji Sarwar Sheikh, Congress, public safety,
चंद्रपुरातील वाढती गुन्हेगारी, मुनगंटीवार म्हणाले ” गुंडासाठी फोन..”
Dhule Fake foreign liquor marathi news
धुळे जिल्ह्यात बनावट विदेशी मद्याचा साठा ताब्यात
gadchiroli health issue marathi news
पाच महिन्यांत ६ रुग्णांचा बळी, गडचिरोलीत हिवतापामुळे चिंता
dams, Nashik district, overflow,
चार धरणे तुडुंब, नऊमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साठा, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ५७ टक्क्यांवर
release of Khadakwasla dam should be increased during day to bring water storage to 65 percent says Ajit Pawar
खडकवासला धरणातील विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा ६५ टक्क्यांवर आणावा : पालकमंत्री अजित पवार

हेही वाचा – सफाळे रामबाग जवळ तीन दुचाकींचा विचित्र अपघात; एक ठार तीन जखमी

सुक्या मासळीचे नुकसान

डहाणू, तलासरी, पालघर व वसई तालुक्यात समुद्रकिनारी गावी मासळी सुकवणाऱ्याचे अवेळी पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या संदर्भात माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहसंचालक दिनेश पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा – धानीवरीत गावदेव निमित्त गावात बाल विवाह रोखण्यासाठी नियम; गावाचा स्वागतार्ह उपक्रम

२६ व २७ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सुकविण्यासाठी ठेवलेल्या मासळीचे प्राथमिक अंदाजानुसार पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांचे सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राप्त माहितीनुसार निदर्शनास आलेले आहे.