
जे लोक कामात किंवा इतर कारणांमुळे व्यस्त असतात ते अनेकदा त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. त्यांच्या शरीरात उर्जेची कमतरता असते किंवा रोग होण्याचा धोका वाढतो.

जर तुम्हाला व्यस्त राहून स्वतःची काळजी घ्यायची असेल तर आजपासूनच या गोष्टींचे सेवन करा.

आज प्रत्येकजण गव्हाच्या पिठाची चपाती खातात, कारण आपल्या सर्वांना याची सवय झाली आहे.

त्याऐवजी बाजरीच्या पिठाची रोटी बनवून खाऊ शकता. बाजरीची रोटी खाल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपण दिवसभरात योग्य प्रमाणात पौष्टिक आहार घेतला पाहिजे, परंतु काहीजण कामात व्यस्त असल्याने ते करू शकत नाहीत.

जी लोकं सतत व्यस्त असतात त्यांनी शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासाठी डायफ्रुटसचे सेवन करू शकतात. कामाच्या ठिकाणी ड्रायफ्रुटसचे सेवन देखील सोपे आहे आणि त्यांना खाण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता नसते.

आजही उन्हाळ्यात खेड्यापाड्यात किंवा ग्रामीण भागात सत्तूसोबतचे पाणी भरपूर प्याले जाते.

उन्हाळ्यात उत्साही राहायचे असेल तर सत्तूपासून बनवलेल्या गोष्टी खा. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दोन चमचे सत्तू पावडर एका ग्लासात टाकून प्या.

व्यस्ततेमुळे जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देत नसाल तर आजपासूनच ही सवय बदला. शरीराला पोषक आणि ऊर्जा पुरवण्यासाठी हंगामी फळे खा. करवंद, टिंडे अशा हिरव्या भाज्या दिवसातून एकदाच खाव्यात. (all photo: pexels)