-
दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची स्थिती बिकट होत जाते. पाणीसाठ्यांमधील पाण्याची पातळी कमी जाते.
-
ग्रामीण भाग असो किंवा मग शहरी किंवा निमशहरी सगळीकडे सारखीच अवस्था झालेली पाहायला मिळते.
-
पाण्याच्या टँकरसारखे इतर स्रोत वापरून पाण्याची गरज भागवली जाते.
-
देशातील आणि राज्यातील अनेक भागात एप्रिल, मे महिन्याच्या दरम्यान अशी स्थिती निर्माण होते.
-
अशातच आता मे महिन्याच्या शेवटी पोहचताना मुंबई शहरात पाण्याची कपात केली जाणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
-
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
-
दिवसेंदिवस पाणीसाठा कमी होत असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५.६४ पाणीसाठा कमी आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुंबईत येत्या ३० मे पासून सर्व ठिकाणी ५ टक्के, तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो, त्यातही ५ टक्के आणि १० टक्के कपात लागू होणार आहे.
-
मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ इतकी आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही मुंबईकरांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्याचा उपलब्ध पाणीसाठाही पुरेसा नसल्याने पालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
-
खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकरून पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक आणि लोकसत्ता संग्रहित आहेत)
![Gold Silver Price 26 July](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/05/Gold-Price-1.jpg?w=300&h=200&crop=1)
Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! सोन्याचे भाव कोसळले; १० ग्रॅमचा भाव ऐकून आताच सराफा बाजार गाठाल!