
करोना संकटाच्या दोन वर्षांच्या कालखंडा नंतर माऊलींच्या सोबतीने विठुरायाच्या भेटीला जाण्याची रुखरुख संपली.

संकटाची वर्ष सरल्यानंतर आता अलंकापुरीत आलेला वैष्णवांचा मेळा माउलींच्या सावलीत पंढरीच्या वाटेवर निघाला.

श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे शुक्रवारी (२४ जून) सकाळी मार्गक्रमण होणार आहे.

पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने राज्याच्या वेगवेगळ्या भागातून वारकरी सहभागी होतात.

टाळ आणि मृदुंगाच्या गजरात विठूनामाचाजयघोष करीत शंभर वारकऱ्यांना गुरुवारी मेट्रोची सफर घडवून आणण्यात आली.

नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि सारथी कट्टा यांच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

टाळ-मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाचा गजर मेट्रोत झाला.

मेट्रोत जणू भक्तीरसाचा मळा फुलून आला.

उत्साहाने भारलेल्या वारकऱ्यांनी देहभान हरपून ‘माऊली, माऊली…’ चा अखंड अखंड घोष करीत चैतन्य भरले आणि भक्तीकल्लोळाला जणू उधाणच आले.

रविवार, १० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे.

महाराष्ट्राला वारीची परंपरा लाभली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संतशिरोमणी तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव, निळोबाराय, नरहरी महाराज, सेना महाराज, सावता माळी, चोखोबा अशी भागवत संप्रदायातील संतांची मालिका आहे.

(सर्व फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)