आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वात कमी ९ मतांनी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. त्याच वेळी सर्वाधिक मताधिक्य हे ६ लाख, ९६ हजार एवढे आहे. सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा इतिहास बीडच्या प्रीतम मुंडे यांनी रचला होता. १९६२ पासून सर्वात कमी मतांनी विजयी झालेले उमेदवार : १९६२ : रिशांक किशिंग – मणिपूर (सोशालिस्ट पार्टी) : ४२ मते

१९६७ : एम. राम – हरयाणा (काँग्रेस) : २०३ मते

१९७१ : एम. एस. सिवास्वामी – तमिळनाडू (द्रमुक) : २६ मते

१९७७ : दाजीबा देसाई – कोल्हापूर , महाराष्ट्र (शेकाप) : १६५ मते

१९८० : रामनयम राम – उत्तर प्रदेश ( काँग्रेस) : ७७ मते

१९८४ : मेवा सिंग – पंजाब (अकाली दल) : १४० मते

१९८९ : के. रामकृष्ण – आंध्र प्रदेश (काँग्रेस) : ९ मते

१९९१ : राम अवध – उत्तर प्रदेश (जनता दल) : १५६ मते

१९९६ : सत्यजितसिंह गायकवाड – गुजरात (काँग्रेस) : १७ मते

हेही वाचा : Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट

१९९८ : सोम मरांडी – बिहार (भाजप) : ९ मते

१९९९ : प्यारेलाल शंकवार – उत्तर प्रदेश ( बसपा) : १०५ मते

२००४ : डॉ. पी. पुखनीकोया – लक्षद्विप ( जनता दल-युनायटेड) : ७१ मते

२००९ : नरो नारायण – राजस्थान (काँग्रेस) : ३१७ मते

२०१४ : टी. चेवांग – लडाख (भाजप) : ३६ मते २०१९ :

भोलेनाथ – उत्तर प्रदेश (भाजप) : १८१ मते

(संकलन : संतोष प्रधान)