काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये भारतीय लोकशाही, मोदी सरकारवर केलेल्या भाष्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेची तसेच देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. मात्र राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार दिल्यामुळे त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी भाजपाने केली आहे.

हेही वाचा >>> Karnataka Election: मंड्या येथील पंतप्रधान मोदींच्या मिरवणुकीमुळे भाजपात जोष; हिंदुत्वाच्या मुद्द्याची धार कमी करण्याची सूचना

bjp budget and manifesto
Budget and BJP : भाजपाने जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासने बजेटमध्ये किती उतरली?
ajit pawar meets amit shah in delhi ahead of assembly polls in maharashtra
शहांच्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता?अजित पवारांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
thorat
फुटीर आमदारांवर कारवाई; काँग्रेसने नावे जाहीर करण्याचे टाळले
Anger about allies in BJP meeting  Complaints of Shiv Sena  NCP not working in Lok Sabha Mumbai
भाजपच्या बैठकीत मित्रपक्षांविषयी नाराजी; शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत काम न केल्याच्या तक्रारी
BJP rebels put Puducherry government in crisis AINRC
काँग्रेसचे आमदार फोडून सत्तेवर आलेल्या भाजपामध्ये धुसफूस; पुडुचेरीमध्ये काय घडतंय?
PM Narendra Modi Mocks Rahul Gandhi
नरेंद्र मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, “काँग्रेसकडून पडलेल्या लहान पोराचं मन रमवण्याचा प्रकार..”
Rahul Gandhi debut as Leader of the Opposition first speech aggression
राहुल गांधींच्या भाषणावर मोदी-शाहांसह सत्ताधाऱ्यांनी का नोंदवला आक्षेप?
The israeli supreme court s historic verdict on hardline jews military service is compulsory
विश्लेषण: इस्रायल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे नेतान्याहूंची कोंडी? कट्टर ज्यूंनाही लष्करी सेवा अनिवार्य करण्याचा निर्णय का गाजतोय?

विशेष समितीची स्थापना करण्याची मागणी

भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेत बोलू दिले जात नाही, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. राहुल गांधी यांच्या याच विधानाची भाजपाने दखल घेतली आहे. खासदार राहुल गांधी यांना सभागृहातून निलंबित करावे. या कारवाईच्या शक्यतेवर अभ्यास करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करावी, अशी मागणी भाजपाने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा >>> उत्तराखंड राज्याची जन्मकथा; ज्याच्या उत्तरकळा आजही राज्याला जाणवतात

ओम बिर्ला यांनी भाजपाची मागणी मान्य करत विशेष समितीची स्थापना केल्यास या समितीत भाजपाच्या नेत्यांचा अधिक समावेश असण्याची शक्यता आहे. या समितीकडून राहुल गांधी यांनी केलेले विधान तसेच त्यांच्यावरील कारवाईची शक्यता कायद्याच्या कसोटीवर तपासली जाईल. त्यानंतर महिन्याभरात ही समिती आपला अहवाल लोकसभा अध्यक्षांना सादर करेल.

काँग्रेसमध्ये सध्या काय सुरू आहे, यात आम्हाला रस नाही, पण…

भाजपाने केलेल्या या मागणीवर भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाची भाजपाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीरपणेच हाताळले गेले पाहिजे, असे आम्हाला वाटते. देशाशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट आपल्या सर्वांसाठीच चिंतेची बाब आहे. काँग्रेसमध्ये सध्या काय सुरू आहे, यात आम्हाला रस नाही. मात्र राहुल गांधी यांनी देशाचा अपमान केलेला आहे. त्यामुळे आम्ही शांत बसू शकत नाहीत,” असे रिजिजू म्हणाले.

हेही वाचा >>>Karnataka Election 2023 : तिकीट मिळवण्यासाठी भाजपामध्ये चढाओढ; विद्यमान मुख्यमंत्री बोम्मई यांच्या उमेदवारीबाबतही संभ्रम?

सभागृहाचीही प्रतिमा मलिन झाली आहे

“भारताविरोधी बोलणाऱ्या लोकांप्रमाणेच राहुल गांधी यांची भाषा आहे. राहुल गांधी यांनी भारताची प्रतीमा मलीन केली आहे. यासह ते ज्या सभागृहाचे सदस्य आहेत, त्या सभागृहाचीही प्रतिमा मलिन झाली आहे,” असा आरोपही रिजिजू यांनी केला.

दरम्यान, राहुल गांधी यांनी मी माफी मागणार नाही, असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. मी कोणतेही देशविरोधी विधान केलेले नाही. मला संधी दिली, तर तेच विधान मी संसदेतही करेन, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे.