आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. याचाच भाग म्हणून पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील हे राज्यात दाखल होत आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाई जगताप यांना हटविण्यात आल्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नाना पटोले कायम राहतात की त्यांचा पुढील क्रमांक लागतो याची पक्षात चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात काँग्रेसची एकेकाळी मजबूत ताकद होती. पण २०१४ पासून राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू झाली. २०१९ मध्ये तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. लोकसभेत कसाबसा एक खासदार आणि ४४ आमदार निवडून आले होते. गेल्या चार वर्षांत पक्ष वाढीसाठी फार काही प्रयत्न झाले नाहीत. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकी स्वबळावर की महाविकास आघाडीतून लढवायच्या याबाबतही पक्षात एकमत होत नाही. स्वबळावर लढण्याची तेवढी ताकद राहिलेली नाही आणि महाविकास आघाडीत लढायचे म्हटल्यास फार कमी जागा वाट्याला येऊ शकतात. या तिढ्यातून पक्ष अद्यापही बाहेर पडलेला नाही.

Sharad Pawar, NCP, Chief Minister, Maha Vikas Aghadi, Uddhav Thackeray, Shiv Sena, Congress, Sanjay Raut,
मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांच्या भूमिकेने महाविकास आघाडीतील तिढा वाढला
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
jay pawar
बारामतीच्या राजकारणात जय पवार सक्रिय
With help of MLA Geeta Jain strategy to defeat BJP is being planned by cm Eknath Shinde
मीरा-भाईदरमध्ये मुख्यमंत्र्यांकडूनच भाजपची कोंडी
congress chief claim govt u turn on lateral entry
आमच्यामुळेच निर्णय रद्द!‘थेट भरती’वरून काँग्रेस अध्यक्षांचा दावा, ‘इंडिया’ नेत्यांची सरकारवर टीका
dharmarao baba Atram, Dictatorship, Gondia,
पालकमंत्री आत्राम यांची हुकूमशाही, डीपीडीसी सदस्यांना बोलण्यास मनाई
Rohini Khadse, Rupali Chakankar, corporator,
रुपालीताई, आधी नगरसेवक म्हणून निवडून या – रोहिणी खडसे यांचा सल्ला
Praniti shinde, Congress Solapur,
सोलापुरात काँग्रेसपुढे पेच

हेही वाचा – भाजपाच्या २२० महिन्यांच्या सत्तेत २२५ घोटाळे झाले; प्रियंका गांधींची टीका, मध्य प्रदेश निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात

महाविकास आघाडीबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे मावळते अध्यक्ष भाई जगताप यांची विरोधी भूमिका आहे. नाना पटोले हे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अंगावर जातात. महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांनी एकत्रित लढायचे असल्यास नाना पटोले यांचा अडसर असल्याचे काँग्रेस नेत्यांनी दिल्लीच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसेच राष्ट्रवादीचाही पटोले यांना विरोध आहे.

हेही वाचा – लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले ब्रिजभूषण सिंह लोकसभा निवडणूक लढवणार का? भर सभेत केले जाहीर; म्हणाले “मी…”

गेल्याच आठवड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांची दिल्लीत भेट घेतली. कदाचित अशोकरावांकडे पुन्हा अध्यक्षपद सोपविले जाऊ शकते. मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षपद त्यांनी यापूर्वी भूषविले आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर अशोकरावांच्या नावाचा प्रदेशाध्यक्षपदी विचार होऊ शकतो. अर्थात, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आपणच प्रदेशाध्यपदी कायम राहणार असल्याचे नाना पटोले यांनी जाहीर केले आहे. पटोले यांचे राहुल गांधी यांच्याशी चांगले संबंध आहेत. यामुळेच राहुल गांधी कोणता निर्णय घेतात यावर राज्य काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचे भवितव्य ठरणार आहे.