पिकअप जीपला पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारची धडक बसून झालेल्या गंभीर अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला. तर, २१ जण जखमी झाले. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कुसगावच्या हद्दीत सोमवारी (४ नोव्हेंबर) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे राऊतवाडी परिसरावर शोककळा पसरली.
सुमन मारुती राऊत (वय ५०), शीलाबाई दत्ता दळवी (वय ३५), गिरिजाबाई किसन राऊत (वय ४५, सर्व रा. राऊतवाडी, करूंज, पवनानगर, ता. मावळ) अशी या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तीन महिलांची नावे आहेत. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या शांताबाई धोंडू राऊत (वय ६०), कांताबाई हनुमंत राऊत (वय ५८), कलाबाई रामू घारे (वय ५६) यांची प्रकृती चिंताजनक आहे.
द्वारका रमेश राऊत (वय ३५), सुमन किसन राऊत (वय ३५), पप्पू दामू राऊत (वय ३०), दामू नथू राऊत (वय ५२), मारुती लक्ष्मण राऊत (वय ५५), कांताबाई ईश्वर राऊत (वय ५२), सरूबाई दशरथ राऊत (वय ६५), वेणूबाई यशवंत राऊत (वय ४५), संगीता रोहिदास राऊत (वय ३५), ताराबाई हरीभाऊ राऊत (वय ६५), रखमाबाई गोपीनाथ राऊत (वय ६३), हौसाबाई मारुता राऊत (वय ६२), दत्तू नथू राऊत (वय ४८), अनिता बाळू ठाकर (वय ३५), मुक्ताबाई नामदेव राऊत (वय ४८), सुमन दामू राऊत (वय ३६), भागाबाई नामदेव राऊत (वय ६०) आणि लक्ष्मीबाई राहुल काळे (वय ३८, सर्व रा. राऊतवाडी) हे या अपघातामध्ये जखमी झाले आहेत.