खासदार उदयनराजे जरी तुम्ही शरद पवारांबरोबर असला तरी आतून आमच्या बरोबरच आहात, याची मला कल्पना आहे.  राजेंनी राजीनामा देऊन तेथील नागरिकांना त्रास देऊ नये. असा सल्ला केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खासदार उदयनराजे यांना दिला. उदयनराजे यांनी बॅलेट पेपरवर निवडणुकीबाबत विधान केले होते. याबाबत प्रश्न विचारला असता आठवलेंनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भूमिका मांडली त्यांनी मांडली. तसेच यावेळी त्यांनी राजकीय अनेक घडामोडीवर भाष्य केले.

आठवले म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष हा कमळ या चिन्हावर लढणार नसुन स्वतंत्र चिन्हावर लढणार आहे. आगामी निवडणुकीनंतर भाजप, शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन वर्ष मुख्यमंत्रीपद घ्यावे आणि राहिलेले एक वर्ष आरपीआयला मुख्यमंत्री पद द्यावे. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.