लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शिरूरचे खासदार कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. ते राजकारणातील दुसरे संजय राऊत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे केली. कोल्हे यांनी पाच वर्षात काय काम केले, हे दाखवावे, असे आव्हानही आढळराव यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही टीका केली.

ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
What Ajit Pawar said?
अजित पवार स्पष्टच बोलले, “काल-परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं आणि मी कपाळावरच हात मारला”
sharad pawar
आघाडीत बिघाडी? मित्रपक्षाचं शरद पवारांना पत्र; प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख करत म्हणाले, “काँग्रेसच्या चुकांचं पापक्षालन…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

आणखी वाचा- बारामतीमधून ‘शरद पवार’ निवडणूक रिंगणात…जाणून घ्या काय आहे प्रकार?

ते म्हणाले की, शिरूरच्या विद्यमान खासदारांनी पाच वर्षात काहीच काम केले नाही. मात्र त्यानंतरही त्यांची बडबड आणि पोपटपंची सुरू आहे. अजित पवार काही बोलले की त्यांची वचवच सुरू होते. कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षात काय काम केले हे दाखविता येत नाही. मी खासदार असताना केलेल्या कामाची उद्घाटने कोल्हे करत आहेत. पाच वर्षात ते मदारसंघात फिरकले नाहीती, मात्र त्यानंतरही निवडणूक लढविताना त्यांना लाज वाटत नाही, अशी टीका आढळराव यांनी केली