लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील ८२,२६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, काढणीला आलेली रब्बी पिके, उन्हाळी पिके, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

13 year old school boy dies after drowning in private swimming pool
पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…
Controversial statements of Deputy Chief Minister Ajit Pawar again
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा वादग्रस्त वक्तव्ये; तीव्र प्रतिक्रिया उमटताच सारवासारव
mumbai records hottest temprature in 10 years
मुंबईतील दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद; मुंबई, ठाणेकरांची आजही होरपळ

कृषी खात्याच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, १५ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार, अमरावतीत ५३,४०२ हेक्टर, अकोल्यात ११,१५७ हेक्टर, बुलडाण्यात ६,५१३ हेक्टर, वाशिममध्ये ३,८८८ हेक्टर, यवतमाळमध्ये २,४९४ हेक्टर, सोलापुरात १,४४७ हेक्टर, बीडमध्ये १०२१ हेक्टर, नांदेडमध्ये ७४९ हेक्टर, धाराशिव आणि वर्ध्यात प्रत्येकी ३०८ हेक्टर, नंदूरबारमध्ये १२२ हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये १६३ हेक्टर, जालन्यात १३४ हेक्टर, लातूर ९५ हेक्टर, नागपुरात ९० हेक्टर, गोंदियात ४५ हेक्टर, भंडारा १३ हेक्टर, गडचिरोलीत ११ हेक्टर, चंद्रपूर चार हेक्टर आणि परभणीत तीन हेक्टर, असे एकूण ८२,२६४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.

आणखी वाचा-पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

फळपिके, भाजीपाल्याचे मोठे नुकसान

अवकाळी, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे केळी, पपई, संत्री, मोसंबी, आंबा, चिकू, लिंबू या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भात काढणीला आलेला रब्बी गहू, ज्वारी, उन्हाळी बाजरी, भात, तीळ, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी भाजीपाला पिकांच्या मोठ्या नुकसानीचा फटका अकोला जिल्ह्यात बसला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाळी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. त्यासह अकोला परिसरात भाजीपाल्यांच्या रोपांचे उत्पादन हरितगृह किंवा शेडनेटमध्ये घेतले जाते. वादळी वाऱ्यात या हरितगृहांसह शेडनेटचेही मोठे नुकसान झाले आहे.

आणखी वाचा-सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती

अमरावती, अकोल्यात पिके मातीमोल

गारपिटीचा सर्वाधिक फटका अमरावतीला बसला. भातकुली, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार, वरूड या तालुक्यातील ५३,४०२ हेक्टरवरील गहू, ज्वारी, हरभरा, तीळ, भाजीपाला, आंबा, संत्रा, लिंबू, मोसंबी, केळी, पपई पिकांचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोला, बार्शी टाकळी, मुर्तिजापूर, बाळापूर, पातूर या तालुक्यांतील ११ हजार १५७ हेक्टरवरील कांदा, ज्वारी, भाजीपाला, मका, केळी, आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.