लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील ८२,२६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, काढणीला आलेली रब्बी पिके, उन्हाळी पिके, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

More than 55 TMC of water for Jayakwadi from Nashik Nagar
नाशिक, नगरमधून जायकवाडीसाठी ५५ टीएमसीहून अधिक पाणी; पाणी वाटप संघर्ष टळला
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Majority of dams in Nashik district overflow nashik
नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग
Pune, Maharashtra, heavy rainfall, water storage, dams, Marathwada, Konkan division, Pune division, Nashik division, Nagpur division,
राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ६७ टक्के, मराठवाडा वगळता उर्वरित भागांतील धरणे तुडुंब
gadchiroli health issue marathi news
पाच महिन्यांत ६ रुग्णांचा बळी, गडचिरोलीत हिवतापामुळे चिंता
Potholes in Pune are deadly Bike falls and accidents increase 20 percent increase in trauma patients
पुण्यातील खड्डे जीवघेणे! दुचाकी घसरून अपघात वाढले; दुखापतीच्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांची वाढ
dams, Nashik district, overflow,
चार धरणे तुडुंब, नऊमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साठा, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ५७ टक्क्यांवर
release of Khadakwasla dam should be increased during day to bring water storage to 65 percent says Ajit Pawar
खडकवासला धरणातील विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा ६५ टक्क्यांवर आणावा : पालकमंत्री अजित पवार

कृषी खात्याच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, १५ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार, अमरावतीत ५३,४०२ हेक्टर, अकोल्यात ११,१५७ हेक्टर, बुलडाण्यात ६,५१३ हेक्टर, वाशिममध्ये ३,८८८ हेक्टर, यवतमाळमध्ये २,४९४ हेक्टर, सोलापुरात १,४४७ हेक्टर, बीडमध्ये १०२१ हेक्टर, नांदेडमध्ये ७४९ हेक्टर, धाराशिव आणि वर्ध्यात प्रत्येकी ३०८ हेक्टर, नंदूरबारमध्ये १२२ हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये १६३ हेक्टर, जालन्यात १३४ हेक्टर, लातूर ९५ हेक्टर, नागपुरात ९० हेक्टर, गोंदियात ४५ हेक्टर, भंडारा १३ हेक्टर, गडचिरोलीत ११ हेक्टर, चंद्रपूर चार हेक्टर आणि परभणीत तीन हेक्टर, असे एकूण ८२,२६४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.

आणखी वाचा-पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

फळपिके, भाजीपाल्याचे मोठे नुकसान

अवकाळी, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे केळी, पपई, संत्री, मोसंबी, आंबा, चिकू, लिंबू या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भात काढणीला आलेला रब्बी गहू, ज्वारी, उन्हाळी बाजरी, भात, तीळ, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी भाजीपाला पिकांच्या मोठ्या नुकसानीचा फटका अकोला जिल्ह्यात बसला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाळी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. त्यासह अकोला परिसरात भाजीपाल्यांच्या रोपांचे उत्पादन हरितगृह किंवा शेडनेटमध्ये घेतले जाते. वादळी वाऱ्यात या हरितगृहांसह शेडनेटचेही मोठे नुकसान झाले आहे.

आणखी वाचा-सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती

अमरावती, अकोल्यात पिके मातीमोल

गारपिटीचा सर्वाधिक फटका अमरावतीला बसला. भातकुली, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार, वरूड या तालुक्यातील ५३,४०२ हेक्टरवरील गहू, ज्वारी, हरभरा, तीळ, भाजीपाला, आंबा, संत्रा, लिंबू, मोसंबी, केळी, पपई पिकांचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोला, बार्शी टाकळी, मुर्तिजापूर, बाळापूर, पातूर या तालुक्यांतील ११ हजार १५७ हेक्टरवरील कांदा, ज्वारी, भाजीपाला, मका, केळी, आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.