लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : बारामतीची निवडणूक झाल्यानंतर वातावरण बदलल्याचे शरद पवार यांच्या लक्षात आले. त्यामुळे पवार, उद्धव ठाकरे यांचा पक्ष चार जूननंतर काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नरेंद्र मोंदीशिवाय देशाला पर्याय नाही. इंडिया आघाडीकडे नेता, निती, नियत नाही. काँग्रेस डुबती नाव आहे. देशासाठी काही करायचे असेल तर पंतप्रधानांच्या आवाहनानुसार पवार, ठाकरेंनी खऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Raj Thackeray Fatwa
राज ठाकरेंनी काढला फतवा! म्हणाले, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..”
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
Praful Patel on Uddhav Thackeray
प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “उद्धव ठाकरे भाजपाबरोबर…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?

शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची भोसरीतील गावाजत्रा मैदानावर शुक्रवारी ( १० मे) ‘विजयी संकल्प’ सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार विलास लांडे, मंगलदास बांदल, विकास डोळस यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-मतदानाबाबत समाजमाध्यमांतील ‘तो’ संदेश चुकीचा; प्रशासनाची स्पष्टोक्ती

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ग्रामपंचायतीची नसून ही देशाची निवडणूक आहे. देशाला मजबूत, सुरक्षित, विकासाकडे नेऊ शकतो. सामान्य माणसांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करु शकता असा नेता निवडण्याची निवडणूक आहे. वेगवेगळ्या पक्षांची मोठा बांधून महायुती तयार झाली. तर, दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात २४ पक्ष एकत्र आले. पण, नेता ठरवू शकले नाहीत. पंतप्रधान पदाचा उमेदवार सांगूच शकत नाही. सकाळी नऊ वाजता येणा-या भोंग्याने (संजय राऊत) पाच वर्षात पाच पंतप्रधान निवडू असे सांगितले. हा उद्योग, परिवार नाही. देशाचा नेता निवडायचा आहे. इंडिया आघाडीकडे नेता, निती, नियत नाही. मोदी यांना पर्याय नाही. त्यांच्या नेतृत्वात महायुती मजबूत आहे. तिकडे डब्बे नसून सगळे इंजिन आहेत. त्यात बसायला जागा नाही. शिरुरची बोगी मोदी यांच्या इंजिनला जोडावी. त्यानंतर शिरुरला वेगापासून कोणीच वंचित ठेऊ शकणार नाही.

खासदार डॉ. अमोल कोल्हे चांगले कलावंत, नाटककार आहेत. पण, ते कलाकारच राहिले, खासदार होऊ शकले नाहीत. चोखंदळ रसिक एखाद्या नाटकाला पहिल्यांदा तिकीट काढून जातो. दुस-यांदा जात नाही. नाटक ‘फ्लॉप’ झाल्याने कोल्हेंना आता संधी मिळणार नाही. निवडणूक आल्यानंतर निवृत्तीची घोषणा करतात. निवडणूक झाल्यानंतर नाटकच करतात. जनतेला विसरुन जातात. पाच वर्षे कोठे होतात, हे जनता कोल्हेंना विचारत आहे, असेही फडणवीस म्हणाले. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त केली जाईल. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याचे नियोजन केले आहे. तीन-तीन मजले रस्ते तयार केले जाणार असून विकास आराखडा तयार झाला आहे. आधुनिक शहर तयार करण्याचा प्रयत्न आहे. रेडझोनचाही प्रश्न सोडविला जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

आणखी वाचा-पुण्यातील सभेत राज ठाकरेंकडून अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “या माणसाने कधीही…”

पाच पक्ष बदलेले कोल्हे महागद्दार

खासदार डॉ. अमोल कोल्हे दिल्लीला गेले ते परत मतदारसंघात आले नाहीत. गावभेट दौरा, कोणाला भेट नाही. फोन उचलत नाहीत. ८० टक्के खासदार निधी वापराविना परत गेला. विकासाचा मुद्दा नसल्याने खोटे-नाटे आरोप करत असून दिशाभूल करत आहेत. सहानुभूती मिळविण्यासाठी एकनिष्ट असल्याचे सांगत आहेत. पाच पक्ष बदलेल्या कोल्हेंना निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कोल्हे महागद्दार आहेत. ते आम्हाला निष्ठेच्या गप्पा शिकवत आहेत. मी वीस वर्षे धनुष्यबाणासोबत निष्ठेने राहिलो. राष्ट्रवादीला जागा गेल्याने सहमतीचा उमेदवार म्हणून मी घड्याळाच्या चिन्हावर लढत असल्याचा खुलासा आढळराव यांनी केला. २०१९ मध्ये महेश लांडगे यांचे काम करु नका असे निर्देश तत्कालीन नेतृत्वाने दिले होते, असा दावाही त्यांनी केला.

भोसरीतून लाखाचे मताधिक्य देणार

सत्ता नसताना अडीच वर्षे आम्ही फार संघर्षात काढली. सत्ता आल्यानंतर प्राधिकरणाचा साडेबारा टक्यांचा प्रश्न निकाली काढला. शास्तीकर माफ केला. जनता महायुतीसोबत आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मताधिक्य देण्याची ग्वाही आमदार महेश लांडगे यांनी दिली.